इंडिया आघाडीतील पक्षांना 'इगो' भोवला:यामुळेच भाजपने दिल्लीत अशक्य असणारी विजयश्री खेचून आणली, रोहित पवार यांचा दावा
3 hours ago
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या इगोमुळे भाजपचा विजय झाल्याचा दावा केला आहे. 15 हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती, असे ते म्हणालेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारून पराभव झाला. एवढेच नाही तर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय मनिष शिसोदिया यांना पराभवाची चव चाखावी लागली. याऊलट भाजपचा दैदिप्यमान विजय झाला. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपचे अभिनंदन करत इंडिया आघाडीला घरचा आहेर दिला आहे. ..तर भाजपला 20 जागाही मिळाल्या नसत्या रोहित पवार आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! 15 हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. नितीन राऊतांनी दिला काँग्रेससह 'आप'ला दोष दुसरीकडे, काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी एका हाताने टाळी वाजत नसते असे नमूद करत या पराभवासाठी आप व काँग्रेस या दोघांचेही चुकल्याचा दावा केला आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. आपण ज्याला आघाडी म्हणतो, त्यात दोन्ही पक्षाने समन्वय साधायचा असतो. पण या निवडणुकीत अरविंद केजरीवाल व काँग्रेस या दोघांचेही चुकले. आता जे झाले ते भविष्यात घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मागील निवडणुकीत आम्हाला केवळ 4 टक्के मतदान पडले होते. ते आता 7 टक्क्यांवर पोहोचले आहे. यामुळे आम्ही लोकांमध्ये जात असून, पुढच्या निवडणुकीची तयारी करणार आहोत, असे ते म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)