धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडला वाचवण्याचा प्रयत्न:फडणवीसांच्या जवळच्या नेत्याचा आरोप; राजीनामा देणे योग्यच असल्याचा केला दावा

2 hours ago 1
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांडाचे सत्य बाहेर येण्यासाठी त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील उपरोक्त भाष्य केले आहे. नरेंद्र पाटील येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी योग्यच आहे. आपला सहकारी किंवा पार्टनर एखाद्या प्रकरणात अडकला असेल तर संबंधितांनी लगेच बाजूला झाले पाहिजे. प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात चिघळले असताना धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडच्या परळी येथील कार्यालयात जाऊन भेटीगाठी घेत होते. यावरून धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट आहे. यामुळेच दमानिया व सुरेश धस यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी अतिशय रास्त आहे. आज-काल शपथविधी केव्हाही होतो धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर या प्रकरणी कोणताही दबाव राहणार नाही. चौकशी चांगल्या पद्धतीने व पारदर्शक होईल. प्रकरणातील सत्य सुद्धा बाहेर येईल. या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यावी. आज-काल पहाटे, दुपारी किंवा सायंकाळी केव्हाही शपथविधी होतो. त्यामुळे एका मंत्र्यासाठी पुन्हा शपथविधी होऊ शकतो यात शंका नाही, असा टोलाही नरेंद्र पाटील यांनी धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाणला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीत धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख होत असेल तर त्यांनी पदापासून अलिप्त रहावे, असेही ते यावेळी म्हणाले. हे ही वाचा... नामदेवशास्त्रींचा यू-टर्न?:पंकजांसोबतच्या वादात गडावर राजकारण न करण्याची घेतली होती भूमिका, पण धनंजय मुंडेंसाठी सरसावले बीड - भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन गडाची पर्यायाने वंजारी समाजाची ताकद भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभी केली आहे. शास्त्रींनी पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या कथित वादात गडावरून राजकारण न करण्याची भूमिका घेतली होती. पण आता त्यांनीच धनंजय यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी राजकीय वादात न पडण्याचा आपली भूमिका बदलली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article