निलंबनानंतर शिवराज राक्षेची प्रतिक्रिया:म्हणाला - पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा
3 hours ago
1
अहिल्यानगरमध्ये रविवारी 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत पैलवान पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेला चितपट केले. या सामन्यात 40 सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षेने पंचांशी वाद घातला. तसेच एका पंचाला लाथ देखील मारली. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेने त्याला तीन वर्षांसाठी निलंबित केले. या निलंबनानंतर शिवराज राक्षेने प्रतिक्रिया दिली. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा, असे तो म्हणाला. नेमका काय म्हणाला शिवराज?
शिवराज राक्षे म्हणाला की, हे सर्व चुकीचेच झाले. हे सर्वांनी पाहिले. ज्यावेळेला कुस्ती झाली तेव्हा आम्ही पंचांकडे व्हिडिओ पाहून निर्णय घेण्याची. तुम्ही आधी असा निर्णय घेऊ शकत नाही. तसा अधिकार नाही. आम्ही तिथे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे व्हिडिओ दाखवा आणि त्यानुसार निर्णय घ्या, अशी मागणी केली. जर दोन्ही खांदे टेकले असतील, तर हार मानायला तयार आहे, कुस्तीत हार जीत होत असतेच, त्याबद्दल शंका नाही. पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा. दरम्यान, पंचांनी माझ्या मुलाला आदल्या दिवशी शिवीगाळ केली होती. माझ्या मुलावर जर निलंबनाची कारवाई केली, तर मग पंचांवर कारवाई का नाही? पंचांना शिक्षा का केली जात नाही? असा सवालही त्याच्या आईने केला. आमचा मुलगा गरीब घरातला आहे. पंचांनी रिप्ले का दाखवला नाही? चूकही मान्य केली पण ती नंतर मान्य केली. माझ्या मुलाचे इतकेच म्हणणे होते की रिप्ले दाखवा. तो दाखवला नाही. पंचांनी शिवीगाळ करणे किती बरोबर आहे? तीन वर्षे जर त्याचे निलंबन केले आहे, तर मग पंचावर कारवाई केली पाहिजे, त्यांचीही चूक आहेच. मागच्या वर्षीही शिवराज राक्षेवर अन्यायच करण्यात आला. हे नेहमी घडत आले आहे, असे शिवराजच्या आई म्हणाल्या. अंतिम सामन्यातही झाला गोंधळ उपांत्य फेरीनंतर अंतिम सामन्यातही गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना चांगलाच रंगला होता. पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. यावेळी महेंद्र गायकवाडने देखील पंचांबरोबर वाद घातला. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने त्यालाही तीन वर्षांसाठी निलंबित केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)