प्रकल्प मंजुरीनंतर 30 वर्षांनी धावली नगर-बीड रेल्वे:दक्षिणेतील प्रवाशांना शिर्डी, शनिशिंगणापूरला जाणे शक्य, परळीपर्यंत 2026 पर्यंत पूर्ण क्षमतेने धावणार
2 hours ago
1
अहिल्यानगर- बीड परळी रेल्वेमार्गाला १९९५ मध्ये तत्वतः मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी (५ फेब्रुवारी) सहाव्या टप्प्यात विघनवाडी ते बीड रेल्वेमार्गावर चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आता मंजुरीच्या तब्बल ३० वर्षांनंतर अहिल्यानगर ते बीड रेल्वे धावणार आहे. पुढच्या सातव्या टप्प्यांत २०२६ पर्यंत हा लोहमार्ग पूर्ण होणार असून, ४ हजार ५०० कोटींच्या नगर-बीड-परळी नवीन रेल्वेमार्गामुळे दक्षिणेतील प्रवाशांना परळीहून नगरमार्गे थेट शिर्डी, शनिशिंगणापूरला जाता येणार आहे. नवीन रेल्वे मार्गामुळे २०३० पर्यंत पुणे-मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. अहिल्यानगर-बीड-परळी हा स्वतंत्र रेल्वे मार्ग वर्षभरात पूर्ण होणार आहे. गेल्या ३० वर्षांपूर्वी स्व. खासदार गोपीनाथ मुंडे यांनी अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर बऱ्याच कालखंडानंतर १९९५ मध्ये या रेल्वेमार्गाला तत्वतः मंजुरी मिळाली. २०११ मध्ये रेल्वेमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. २०१६ नंतर या कामाला वेग आला. ४ हजार ५०० कोटींच्या खर्चाचा अहिल्यानगर, बीड, परळी रेल्वेमार्गाचा प्रकल्प आहे. एकूण २६० किमीचा हा लोहमार्ग आहे. १६७ किलोमीटरच्या लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. १६५ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाली आहे. सध्या या लोहमार्गावर अहिल्यानगर ते विघनवाडी ही ४ डब्याची डेम्यू रेल्वे धावत आहे. सहाव्या टप्प्यात विघनवाडी ते बीड हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्याने बुधवारी (५ फेब्रुवारी) या ३० किमीच्या लोहमार्गावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. या वेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशाकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता राकेशकुमार यादव, उपमुख्य अभियंता (बांधकाम) दत्तात्रय लोळगे, कार्यकारी अभियंता एस. सुरेश, वरिष्ठ अभियंता विद्याधर धांडोरे, वरिष्ठ विभाग अभियंता सत्येंद्र रा. कुवर, संजय श्रीवास्तव आदी उपस्थित होते. पुण्या-मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढणार बीड ते परळी असे ९० किमी काम पूर्ण होणार असून, २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वेला देण्यात आले आहे. परळीपर्यंत रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर हैदराबाद, सिकंदराबाद तसेच मराठवाडा (प्रामुख्याने नांदेड, बीड) येथील प्रवाशांना अहिल्यानगर-बीड परळी रेल्वे मार्गाने थेट मुंबई पुण्याला जाणे शक्य होणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
प्रकल्प मंजुरीनंतर 30 वर्षांनी धावली नगर-बीड रेल्वे:दक्षिणेतील प्रवाशांना शिर्डी, शनिशिंगणापूरला जाणे शक्य, परळीपर्यंत 2026 पर्यंत पूर्ण क्षमतेने धावणार