बौध्द लेणींच्या संवर्धनासाठी 15 तारखेला आंदोलन:समाजाच्या विविध मागण्यांसाठी शेकडो बौध्द बांधव आंदोलनात होणार सहभागी

2 hours ago 1
पुरातत्व खात्यामार्फत विविध बौद्ध लेण्यांचे तत्काळ संवर्धन व्हावे या मागण्यांकरीता मंगळवार दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन व तीव्र निदर्शने पातळेश्वर येथील पुरातत्व विभागीय कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व आयोजक मिलिंद अहिरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दीपक गायकवाड, मिलिंद आहिरे, शैलेंद्र मोरे,महेंद्र कांबळे,सचिन साठे, श्रीनाथ कांबळे व महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धक समूह उपस्थित होते. या आंदोलनातील प्रमुख मागण्या आहेत की, घोरावाडी (शेलारवाडी), बेडसे, कार्ला, भाजे, पाटण, बौद्ध लेणी पुणे-मुंबई महामार्गांवर त्वरित दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. येळघोल, शिरवळ, तसेच कराड तालुक्यातील दुर्लक्षित बौद्ध लेणी संरक्षित आणि संवर्धीत कराव्यात. जुन्नर तालुक्यातील अंबा अंबिका भीमाशंकर भूत लेणी यांना जोडणारा रस्ता उत्कृष्ट दर्जाचा बनविण्यात यावा. तसेच विजेची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवावी. भंडारा डोंगर (सुदुंबरे गांव) देहूरोड बौद्ध लेणी अतिक्रमण काढून तेथील प्राचीन बौद्ध स्तुपाचे संवर्धन, तथा येण्या-जाण्यासाठी रस्ता व विजेचे पथदिवे उभारण्यात यावेत. कोंडाणे लेणी कर्जत येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. त्यामुळे लेणीची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी. जुन्नर तालुक्यातील सुलेमान टेकडीवर असणाऱ्या बौद्ध लेणीस जाण्यासाठी रस्ता नसल्याने, अभ्यासक पर्यटक यांची गैरसोय होत आहे. सद्यस्थितीत लेणीवर जाणे जीवावर बेतू शकते, यासाठी तिथे स्वतंत्र्य रस्ता आणि संरक्षण कठडे उभारण्यात यावेत. प्राचीन बौद्ध वारसा व त्याचा अभ्यास जनसामान्यास कळण्यासाठी संरक्षित लेणीवर पुरातत्व खात्यामार्फत प्रशिक्षित गाईड (अभ्यासक) नेमण्यात यावेत. बौद्ध अनुयायी, अभ्यासक, पर्यटक यांना सुरक्षा रक्षकांच्या अरेरावीचा नेहमीच सामना करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही गटांत नेहमी वाद होताना दिसतात. ते थांबवण्यासाठी खाजगी कंपनीला दिलेले टेंडर काढून पुरातत्व खात्याने स्वतःचे सुरक्षा रक्षक नेमावेत. प्रत्येक लेणीवर पिण्याचे पाणी, विज (लाईट), स्वच्छता गृह, पार्किंग व्यवस्था करण्यात यावी. विविध लेणींवर असणारे शिलालेख तसेच प्राचीन शिल्प जतन करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article