मराठवाड्याच्या हक्काचे भावलीतील 13 दलघमी पाणी शहापूरकडे वळवले:पाणी योजनेचे 65 टक्के काम पूर्ण 181 कोटी झाला खर्च
3 hours ago
1
मराठवाडा दुष्काळी भाग असल्यामुळे इतर खोऱ्यातून पाणी आणून ही तूट भरुन काढण्याबाबत शासन घोषणा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात वैजापूर-गंगापूरसाठी बांधण्यात आलेल्या भावली धरणाचे पाणी १३ दलघमी पाणी ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि ९७ गावांसाठी वळवण्यात येत आहे. त्यासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून १८१ कोटी रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे मार्च २०२५ पर्यंत ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे मराठवाड्यात पाणी आणण्याच्या घोषणा केल्या जात असताना दुष्काळी भागातले हक्काचे पाणीच पळवले जात आहे. शहापूर पाणीपुरवठा योजनेची १८१ कोटींची कामे झाली याबाबत जलतज्ञ शंकरराव नागरे यांनी याचिका दाखल केलेली असून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार या शपथपत्रात १८१ कोटींचे काम पूर्ण झाले आहे. हे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे नियोजन असल्याचे या शपथपत्रात सांगण्यात आले आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने ठाण्यातल्या प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता या शहापूरच्या योजनेसाठी ३१६ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. ही कामे गतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये भाम भावली वाकी आणि मुकणे हे चार धरणे गंगापूर आणि वैजापूर या दुष्काळी भागासाठी बांधण्यात आली आहेत. यामध्ये भावलीचे ४० दलघमी असलेले पाणी गंगापूर-वैजापूरसाठी आरक्षित आहे. या चार धरण्याच्या माध्यमातून दोन तालुक्यात ४४ हजार हेक्टर सिंचन होते. मात्र,भावलीच्या एकूण क्षमतेच्या ३२ टक्के पाणी वळवले जात आहे. ^भावलीच्या पाणी प्रश्नासंदर्भात मी याचिका दाखल केली आहे. शहापूर योजनेचे ६५ टक्के काम झाले असून १३ दलघमी पाणी वळवले जात आहे. एकीकडे पाणी आणण्याच्या घोषणा केल्या जात असताना पाणी पळवण्याचे धोरण सुरु आहे. -शंकरराव नागरे, अध्यक्ष मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान ^शहापूरसाठी पिण्यासाठी शासनाने हे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळाने याबाबत शासनाला तत्कालीन अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केला होता.मात्र शासनाने हे पाणी देण्याचा निर्णय घेतला असून योजनेचे काम पूर्णत्वास येत आहे. -संतोष तिरमनवार, कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ ^गंगापूर आणि वैजापूरसाठी हे भावलीच्या पाण्याचे आरक्षण आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना केल्या जात असल्या तरी हे पाणी आमच्या हक्काचे आहे. यावर गंगापूर आणि वैजापूरमध्ये शेतकऱ्यांच्या सिंचनावर त्याचा परिणाम होईल. -प्रशांत बंब, आमदार गंगापूर गंगापूर, वैजापूरच्या सिंचनावर होणार परिणाम पिण्यासाठी पाण्याचे आरक्षण पाणी आमच्या हक्काचे
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)