'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अनियमितता'; राहुल गांधींचा पुन्हा निवडणुक आयोगावर निशाणाFile Photo
Published on
:
07 Feb 2025, 7:46 am
Updated on
:
07 Feb 2025, 7:46 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा आम्ही सर्वांनी अभ्यास केला. यामध्ये आम्हाला मततदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळल्या असल्याचा दावा करत संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि त्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करत पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ते दिल्लीत आज (दि.७) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
५ महिन्यात वाढलेले मतदार कोण?- खा. राहुल गांधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा आम्ही अभ्यास केला. यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आढळून आली. महाराष्ट्रात ५ महिन्यात इतके मतदार कसे वाढले? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. याचवेळी हिमाचल प्रदेशमध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढेच मतदान झाले आहे, असेही स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.
#WATCH | Delhi | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "We represent on this table - the entire opposition that fought the last election in Maharashtra. We are going to bring some information about the election. We studied the details - the voters and the voting list.… pic.twitter.com/OeDR2NeKT1
— ANI (@ANI) February 7, 2025आम्हाला नाव, पत्त्यांसह मतदार यादी द्या; विरोधी पक्षांची मागणी
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मतदार यादांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. आम्हाला नाव, पत्त्यांसह मतदार यादी हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आजच्या पत्रकार परिषदेत केली आहे. निवडणूक आयोग याद्या का देत नाही; राहुल यांचा सवाल निवडणुक आयोग आम्हाला लोकसभा, विधानसभा निवडणुक फोटोंसह यादीची मागणी केली आहे. परंतु निवडणुक आयोग आम्हाला या याद्या देत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.