विरोधकांची टीका, सत्ताधाऱ्यांकडून समर्थन; अर्थसंकल्पावर कोण काय म्हणाले?

3 hours ago 1

विरोधकांची टीका, सत्ताधाऱ्यांकडून समर्थन; अर्थसंकल्पावर कोण काय म्हणाले? file photo

मोहन कारंडे

Published on

01 Feb 2025, 9:47 am

Updated on

01 Feb 2025, 9:47 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात आयकराबाबत मोठी घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षांकडून अर्थसंकल्पाबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांवर टीका केली जात आहे. तर सत्ताधारी पक्षाने विकास आणि मध्यमवर्गाचा अर्थसंकल्प म्हटले आहे.

१४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा अर्थसंकल्प : PM मोदी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा आणि प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. (Budget 2025)

मध्यमवर्गाला कर सवलतीचा मोठा फायदा होईल : अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा अर्थसंकल्प मध्यमवर्गासाठी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर ही घोषणा मध्यमवर्गाच्या आर्थिक कल्याणात मोठी मदत करेल. २०२५ चा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या प्रत्येक क्षेत्रात विकसित आणि सर्वोत्तम भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाचा आराखडा आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय, महिला, मुलांचे शिक्षण, पोषण, आरोग्य, स्टार्टअप्स, आणि गुंतवणूक अशा प्रत्येक क्षेत्राचा समावेश आहे. हे बजेट मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा रोडमॅप आहे, असे ते म्हणाले.

विकासाचे इंजिन रुळावरून घसरले आहे : जयराम रमेश

काँग्रेसने म्हटले आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विकासाच्या चार इंजिनांबद्दल बोलले होते. शेती, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात, परंतु अर्थसंकल्प पूर्णपणे रुळावरून घसरला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी चार इंजिनांबद्दल सांगितले, पण इतके इंजिन होते की अर्थसंकल्प पूर्णपणे रुळावरून घसरला आहे. बिहारसाठी अनेक घोषणा झाल्या आहेत. हे स्वाभाविक आहे कारण या वर्षाच्या अखेरीस तेथे निवडणुका होणार आहेत. पण एनडीएचा दुसरा आधारस्तंभ असलेल्या आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका जयराम रमेश यांनी केली आहे.

स्वप्नवत अर्थसंकल्प : मुख्यमंत्री फडणवीस

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसीत भारताचा आहे. भारताला गतीने पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल. हा एक स्वप्नवत अर्थसंकल्प म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली. 

लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या : एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळाला आहे. त्याचे वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची माहिती बजेटपेक्षा महत्त्वाची : अखिलेश

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, महाकुंभ १२ वर्षांनी येतो. आमच्यासाठी, महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा डेटा बजेटपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. किती लोक मरण पावले, बेपत्ता झाले किंवा जखमी झाले हे सरकार सांगू शकत नाही. सरकारने दिलेले मृत्यूचे आकडे खोटे आहेत. तुम्ही कोणती व्यवस्था केली आहे? हे सरकार म्हणते की आम्ही हिंदूंचा पक्ष आहे, पण ते हिंदूंच्या या सर्वात मोठ्या सणाची व्यवस्था करू शकत नाहीत. चेंगराचेंगरीत लोक मरतील अशी तुमची विकसित भारताची व्याख्या ही आहे का?

आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्प : शिवराज सिंह चौहान

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, हे बजेट आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आहे. यामध्ये कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. आता शेतकरी किसान क्रेडिट कार्डवर ५ लाख रुपयांपर्यंतचा फायदा घेऊ शकतात.

बेरोजगारीचा उल्लेख नाही : थरूर

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, जर तुमचा पगार असेल तर तुम्ही कमी कर भराल. पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर आपल्याला पगार नसेल तर काय? उत्पन्न कुठून येईल? आयकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे प्रत्यक्षात नोकरी असणे आवश्यक आहे. अर्थमंत्र्यांनी बेरोजगारीचा उल्लेख केला नाही.

विकसित भारताचे बजेट : ज्योतिरादित्य सिंधिया

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, हे बजेट भारताचा विकास करण्याच्या आणि पंतप्रधानांचे नवीन भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या संकल्पासाठी आहे. प्रत्येक क्षेत्राचा योग्य अभ्यास केल्यानंतर, एक नवीन नकाशा तयार करण्यात आला आहे. हा एक व्यापक अर्थसंकल्प आहे जो भारताला पुढे घेऊन जाईल. अर्थसंकल्प भारताला केवळ स्वावलंबी बनवणार नाही तर त्याला विश्वगुरू म्हणून स्थापित करेल.

रोजगाराच्या संधी निर्माण होतील : नित्यानंद राय

केंद्रीय मंत्री नित्यानंद राय म्हणाले की, अर्थसंकल्पात बिहारला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यासाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. हे बजेट गरीब, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि मध्यमवर्गीयांना मदत करण्यासाठी आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. मखाना बोर्डाची घोषणा विशेष आहे. कोसी नदी क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या प्रकल्पांसाठी बिहारच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचे आभार मानतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article