महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार:डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची माहिती; महिलांना खरा न्याय मिळणार असल्याचा दावा
2 hours ago
1
महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार असल्याचा दावा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पुण्यात बोलताना केली. या कायद्यातून महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या. पुण्यात सध्या विश्व मराठी संमेलन सुरू आहे. या संमेलनाला शनिवारी डॉक्टर नीलम गोऱ्हे उपस्थित राहिल्या. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार असल्याचे स्पष्ट केले. हा कायदा लागू झाल्यानंतर महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असे त्या म्हणाल्या. आचार्य प्र. के. अत्रे मंचावर 'महिलांविषयक कायदे व न्याय मराठी भाषेत' या विषयावरील परिसंवादात डॉ. गोऱ्हे यांनी विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले. 1980 नंतर महिलांविषयक कायद्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे पोलिस आणि न्यायव्यवस्थेत लिंगभाव संवेदनशीलता वाढली असून, महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी कायद्याची भाषा सर्वसामान्यांना समजेल अशी असावी असे मत मांडले. त्यांनी महिलांना आत्मविश्वासाने मातृभाषेच्या आधारे न्याय मागण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र सरकारने सर्व फौजदारी आणि दिवाणी न्यायालयांची भाषा मराठी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, अद्याप निकालपत्रे मराठीतून दिली जात नाहीत. यासाठी अनुवादक आणि प्रतिवेदकांची संख्या वाढवण्याची गरज आहे. निकम यांनी महिलांवरील वाढत्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हिंसक आशयाचा मुलांवर होणाऱ्या परिणामांबद्दल सावधगिरीचा इशारा दिला. शाळा-महाविद्यालये आणि घरातून मुलांवर योग्य संस्कार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)