संघ देणार ‘फेक नॅरेटिव्ह’ला सडेतोड उत्तर:70 दिवस 12 आघाड्यांवर काम, ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश हिंदूंना देण्यावर भर

2 hours ago 1
“फेक नॅरेटिव्ह’ला सडेताेड उत्तर देऊन संभ्रमित झालेल्या भाजप समर्थक मतदारांचा गैरसमज दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला आहे. संघाचे पदाधिकारी ७० दिवसांत १२ आघाड्यांवर काम करणार असून ‘बटेंगे तो कटेंगे’ असा संदेश हिंदू समाजाला देण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभेत फेक नॅरेटिव्ह, निष्क्रियता आणि अतिआत्मविश्वासामुळे भाजपला जबरदस्त फटका बसला. यामुळे कासावीस झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार संघ मुख्यालयाची वारी केली. शेवटी संघाकडून आश्वस्त केल्यानंतर फडणवीसांचा चेहरा पुन्हा टवटवीत झाल्याचे सर्वांनीच पाहिले. २१ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडले. या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेक नॅरेटिव्हवर भाष्य केले होते. “लोकसभेला जनता भाजपाच्या पाठीशी उभी होती. परंतु, हा लढा तीन नव्हे चार पक्षांशी होता. यातला चौथा पक्ष म्हणजे फेक नॅरेटिव्ह हा होता. या वेळी फेक नॅरेटिव्हविरोधातदेखील आपला लढा होता. पण या निवडणुकीत मिळालेल्या पिछाडीमुळे फेक नॅरेटिव्हशी सामना करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे,’ असे फडणवीस म्हणाले होते. भाजप निवडून आला की संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार’ असा खोटा नॅरेटिव्ह पसरवून विरोधकांनी मते मिळवली. फेक नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरा, असे आवाहनही फडणवीसांनी केले होते. यानंतर बैठकांवरील बैठकांमुळे त्रस्त झालेले भाजपचे कार्यकर्ते फेक नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी वेळ काढू शकलेले नाहीत. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ७० दिवसांचा कार्यक्रम आखला असून त्याबाबत कामदेखील सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. संघ आपल्या पद्धतीने काम करतो. त्यामुळे भाजपचे थेट नाव न घेता हिंदुत्ववादी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पक्षाला निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करणे गरजेचे असल्याचे संघ पटवून देणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, मराठा, हिंदुत्व, सेवा वस्त्या, शेतकरी, भटके विमुक्त, मुस्लिम, ग्रामीण व शहरी भाग आदी समाजाच्या छोटेखानी बैठका घेऊन संघ जागृती करीत आहे. मतभेद बाजूला ठेवून हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्रातील आजच्या वातावरणात सामाजिक भेदांना स्पर्धात्मक विद्वेषाचा रंग देण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबर काही भागात जिहादी मानसिकतेने डोके वर काढले आहे. यासाठी हिंदूंनी एक होण्याचे आवाहन संघाकडून केले जात आहे. “बटेंगे तो कटेंगे’, असे म्हणत मतभेद विसरून हिंदूंनी एकत्र यावे यासाठी संघ कामाला लागला आहे. हिंदुत्व व्यापक आहे. हिंदुत्व म्हणजेच सहिष्णुता आहे. परंतु, हल्ली हिंदूंना दहशतवादी म्हटले जात आहे. वेळीच हिंदू जागा झाला नाही तर उद्या जागे होण्याची संधी मिळणार नाही’ असा संदेश संघ आणि भाजपाकडून दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article