हिंदीत बोलायची गरज काय? मराठी भाषेचा अभिमान बाळगा- राज ठाकरे:पुण्यात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात मान्यवरांची हजेरी
3 hours ago
1
आपण आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे. फ्रेंच लोक त्यांच्या भाषेविषयी इतके प्रामाणिक असतात की तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो. आपल्या देशातसुद्धा अनेक जण असे आहेत. बाकीचे राज्य जर भाषेबद्दल अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो? आपल्याकडची मुले हिंदीमध्ये बोलायला जातात. इंग्रजीमध्ये बोलत असतात. अनेक वेळा भेटल्यानंतर हिंदीमध्ये बोलतातय का बोलायचे हिंदीमध्ये, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप रविवारी झाला या वेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, आता आपल्या येथे राज्य गीत लावण्यात आले होते. मला सांगा, कोणत्या राज्याचं राज्य गीत आहे? जय जय आसाम माझा.. जय जय गुजरात माझा असे आहे का? फक्त जय जय महाराष्ट्र माझा.. असे गीत आहे. संपूर्ण हिंद प्रांतावर जी आक्रमणे झाली ती सगळी बाहेरून झाली, असेही राज यांनी या वेळी सांगितले. समारोप कार्यक्रमाला अनेक रसिक प्रेक्षकांची उपस्थिती होती. मराठी साहित्यात स्त्रियांनी महत्त्वाचे योगदान दिल्याचा चर्चासत्रात सूर मराठी साहित्यात स्त्रियांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. काळानुरूप स्त्रियांच्या भाषेतही बदल होत गेला आहे. त्यातून तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब उमटले आहे. आता अधिकाधिक स्त्रियांनी लिहिते झाले पाहिजे, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. संमेलनात मराठी भाषा आणि स्त्री साहित्य या विषयावर चर्चासत्र झाले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी सहभाग घेतला. उत्तरा मोने यांनी सूत्रसंचालन केले. मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी संमेलने भरण्याची आता गरज आपण साहित्य संमेलन भरवतो, पण मराठी माणसाच्या अस्तित्वासाठीच संमेलन हे शहरा-शहरांमध्ये भरवले पाहिजे, ही माझी शासनाकडे विनंती आहे. आपण ते अस्तित्व टिकवले पाहिजे. नुकत्याच प्रगतीच्या नावावर आमच्याकडच्या जमिनी जाणार असतील मला असे वाटते त्याला विकास नाही म्हणत. विकास नसतो. आपले अस्तित्व पुसण्याचा तो एक प्रकारचा डाव असतो, असेही ते म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)