सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाची युवा ब्रिगेड बांगलादेश विरुद्ध टी 20I मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. मालिकेतील पहिला सामना हा ग्वाल्हेर येथे न्यू माधवराव शिंदे स्टेडियममध्ये होत आहे. या स्टेडियममध्ये 14 वर्षांनंतर सामना होत आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईटवॉश दिला. त्यामुळे आता सूर्यकुमार यादव आणि ब्रिगेड बांगलादेशला 3-0 ने पराभूत करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करणार आहे.
दोन्ही संघ टी 20I वर्ल्ड कप 2024 नंतर आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाने बांगलादेशवर टी 20I वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वात बांगलादेश भारतावर विजय मिळवून मागील पराभवाचा वचपा घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र त्यात बांगलादेशचा चांगलाच कस लागणार आहे. भारताचा संतुलित संघ आहे. त्यामुळे विजय मिळवणं पाकिस्तानसाठी आव्हानात्मकच असणार आहे.
सूर्याला हार्दिकची साथ
टीम इंडियात युवा खेळाडूंसह कॅप्टन सूर्याच्या सोबतीला ऑलराउंडर हार्दिक पंड्यासह विकेटकीपर संजू सॅमसन या अनुभवी जोडीचीही मदत होणार आहे. त्यामुळे हार्दिक आणि संजू या दोघांवर अनुभवी खेळाडू या नात्याने अधिकची जबाबदारी असणार आहे. संजू अभिषेक शर्मासह ओपनिंग करणार आहे. त्यामुळे संजूवर टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असेल. संजू ओपनिंग करणार असल्याने जितेश शर्मा याचा प्लेइंग ईलेव्हनमधून पत्ता कट झाल्याचं स्पष्ट आहे. तसेच टीम मॅनेजमेंट नितीश रेड्डी आणि मयंक यादव या दोघांपैकी कुणाला पदार्पणाची संधी मिळणार? याकडेही लक्ष असणार आहे.
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.