Parbhani: माझी वसुंधरा ४.० अभियानामध्ये ‘या’ नगर परिषद ने विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला

2 hours ago 1

परभणी/मानवत (Parbhani):- महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा अभियान ४. ० सर्वेक्षण अहवाल नुकताच घोषित केला असून यामध्ये मानवत न.पा.प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करत मानवत नगर परिषदेने (City Council) मराठवाडा (Marathwada)विभागातून तृतीय क्रमांक पटकावत ५० लक्ष रुपयाचे पारितोषिक मिळवले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी याच्यासह कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

मुख्याधिकारी याच्यासह कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत

माझी वसुंधरा अभियान हा एक महत्त्वकांक्षी उपक्रम आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य (Local self-government) संस्थांच्या पर्यावरणाच्या सुधारणेसाठी निसर्गाच्या पाच घटकांचा (पंचमहाभूते) यामध्ये पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी व आकाश यांचा समावेश होतो. याचे प्रमुख उद्दिष्ट हरित कव्हर आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, हवा गुणवत्ता निरीक्षण आणि वायू प्रदूषण कमी करणे, जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाझर याविषयी काम करणे, जलस्त्रोत तसेच नद्यांची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करणे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, नवीकरणीय ऊर्जेचा वापर व प्रचार करणे, पर्यावरण सुधारणा आणि संरक्षण याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, इत्यादी उद्दिष्टे आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये व उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो व नागरिकांमुळे या सर्व गोष्टी शक्य होत असतात. त्यामुळे माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये मानवत नगरपरिषदेने उल्लेखनीय कामगिरी करत असताना शहरातील सर्व नागरिकांनी देखील भरभरून प्रतिसाद देत सहकार्य केले, नगरपरिषद स्वच्छता विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले त्याच बरोबर इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

मित्रमंडळाचे आभार मानत यापुढेही असेच सहकार्य राहू द्या- श्रीमती कोमल सावरे

त्यामुळेच सदरील नामांकन मानवत नगर पालिका (Municipality) कार्यालयास प्राप्त झाले आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी शहरातील नागरिक, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आणि मित्रमंडळाचे आभार मानत यापुढेही असेच सहकार्य राहू द्या असे आवाहन श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे. यामध्ये नगर अभियंता सय्यद अन्वर, मंगेश खोडवे, महेश कदम, भगवानराव शिंदे, रामराव चव्हाण, भारत पवार, राजेश शर्मा, विनय आडसकर,शतानिक जोशी, श्री संतोष खरात, संतोष उन्हाळे, हनुमंत बिडवे, दीपक सातभाई, मनमोहन बारहाते, पंकज पवार, सोनाजी काळे,नारायण काळे,संजय कुऱ्हाडे,निवृत्ती लाड,सुनील कीर्तने,स्वच्छता निरीक्षक मुंजाभाऊ गवारे, वसीम शेख यांनी श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र परिश्रम घेतले याबद्दल मुख्याधिकारी सावरे यांनी स्वागत केले आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत शहरातील नागरिक, कर्मचारी, मित्रमंडळांनी व सामाजिक संस्थांनी ज्या पद्धतीने सहभाग नोंदविला त्याचप्रमाणे यानंतरच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा जेणेकरून आपल्या शहराला राज्य पातळीवरती व देशपातळीवरती वेगवेगळे नामांकन प्राप्त होतील या करिता सर्व नागरिकांना आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article