देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (Wardha Bazar Samiti) : कृषी उत्पन्न बाजार समितींना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विविध समस्या त्यांच्यापुढे निर्माण झालेले आहेत. समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता राज्यभरात (Bazar Samiti) बाजार समितीच्या वतीने बंद पुकारण्यात आला. एक दिवसाच्या बंदमध्ये वर्धा जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती सहभाग घेतला. त्यामुळे एका दिवसात बाजार समितीतून होणारी कुट्टी रुपयांची उलाढाल ठप्प राहिली. बंदमुळे बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता.
शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जावे लागते. शेतकऱ्यांचा हक्काचा ठिकाण असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध समस्या आहेत. बाजार समितीचे अडीअडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता बाजार समितीच्या वतीने सात ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे च्या वतीने दिलेल्या बंदच्या हाकेला सर्वच बाजार समितीने प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती (Bazar Samiti) आणि उपबाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या होत्या. बंदमुळे बाजार समितीत कृषी मालाची आवक झाली नाही. बाजार समितीचे एक दिवस कामकाज बंद राहिल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल प्रभावित झाली.
सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक हळूहळू वाढू लागलेली आहे. चार ते पाच हजार क्विंटल पर्यंत सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे. मात्र बंदमुळे सोयाबीन आणि इतर शेतमाल विक्रीसाठी आला नाही त्यांचे लिलावही झाले नाही. वर्ध्याच्या कृषी उत्पन्न (Bazar Samiti) बाजार समितीत देखील शुकशुकाट होता. राज्यातील मोठ्या बाजार समितीत एक असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीनदेखील बंदमध्ये सहभाग घेतला. परिणामी बाजार समिती व्यवहार प्रभावित झाले.
जिल्ह्यातील सर्व बाजार समितींचा बंदमध्ये सहभाग
वर्धा, आर्वी, आष्टी, सिंदी, हिंगणघाट, पुलगाव, समुद्रपूर या बाजार समिती सोबतच देवळी, कारंजा, सेलू आदी (Bazar Samiti) उपबाजारपेठादेखील बंद होत्या. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही. परिणामी एक दिवसाची उलाढाल ठप्प राहिली.
बंदमुळे बाजार समिती परिसरात शुकशुकाट
सध्या सोयाबीन काढणीची कामे सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांनी लवकर निघणाऱ्या सोयाबीनची लागवड केली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांकडे सोयाबीनची आवक सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले आहे ती शेतकरी सोयाबीन विक्री करता बाजार समितीमध्ये घेऊन येत आहे. पण आज (Bazar Samiti) बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करता आणले नाही. परिणामी सोयाबीनची आवक झाली नाही.