आयकर सवलतीची घोषणा, पण तितके कमवायचे कसे?:आदित्य ठाकरेंचा बजेटवर सवाल, म्हणाले - बेरोजगारी रोखण्यासाठी उपाययोजना नाही

2 hours ago 1
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. आता नोकरदार लोकांनी नवीन कर व्यवस्था निवडल्यास 12.75 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यामुळे नोकदारवर्गासाठी दिलासा मानला जात आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. आयकर सवलतीची घोषणा तर केली, पण कमवायचे कसे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. तसेच देशातील वाढती बेरोजगारी रोखण्यावर अर्थसंकल्पात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याची टीकाही त्यांनी केली. आजच्या अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरीकरण, खाणकाम, अर्थ, कर या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. एनडीएकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. काय म्हणाले आदित्य ठाकरे? 2012-14 च्या सुमारास निवडणुकीपूर्वी आयकर रद्द करण्याची घोषणा करणारा भाजप आता अधिक उदार झाल्याचे दिसत आहे. आता ते करांची श्रेणी आणि रिबेटवर करदात्यांशी वाटाघाटी करत असल्यासारखी करसवलत जाहीर करत आहेत. बऱ्याच अटी आणि अनेक छुप्या करांसह ही करसवलत देण्यात येत आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. बेरोजगारी रोखण्यासाठी उपाययोजना नाही देशात जनतेने आपली ताकद दाखवली आहे. भाजपला जनतेने 240 जागांवर रोखले आहे. याआधी बहुमत असलेल्या सरकार जनतेला गृहीत धरत होते. आता सरकार आयकर सवलती आणि अतर सवलतींबाबत घोषणा करत आहे. मात्र, त्यांनी जाहीर केलेल्या श्रेणींपर्यंत पैसे कसे कमवायाचे, याचे काही मार्ग त्यांनी ठेवले आहेत काय? असा सवाल करत देशात सर्वाधिक बेरोजगारी असताना ती रोखण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. बिहारवरून लगावला टोला अर्थसंकल्पीय भाषणात झालेल्या उल्लेखांबद्दल मी बिहारसाठी खूप आनंदी आहोत. बिहारला अर्थसंकल्पात भरभरून मिळाले आहे. तसेच याआधी बिहारसाठी 2015 मध्ये भाजपने दिलेले 1.25 लाख कोटी रुपयांचे पॅकेज आणि 2024 मध्ये भाजपने दिलेले मोठे पॅकेज त्यांना आधीच मिळाले असले, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी सरकारला लगावला. अर्थसंकल्पातील घोषणा बिहारच्या लोकांच्या गरजा पूर्ण करतात का? असा सवालही त्यांनी केला. 2014 पासून महाराष्ट्राकडे भाजपचे दुर्लक्ष अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा उल्लेखही न करणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सातत्याने सर्वाधिक कर भरणाऱ्यांचा, सर्वाधिक जीएसटी भरणाऱ्या महाराष्ट्र आणि मुंबईतील जनतेचा अपमान करण्यात आला आहे. राज्याला वेळेवर त्याचा पूर्ण जीएसटी मिळत नाही, तसेच विकासासाठी निधीही मिळत नाही, असेही ते म्हणाले. 2014 पासून भाजपने आतापर्यंतच्या सर्व अर्थसंकल्पात महाराष्ट्राकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला. याआधीच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे 100 पेक्षा जास्त आमदारांना निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्राला शिक्षा मिळत आहे काय? असा सवालही त्यांनी केला. कंत्राटदारांवर आधारित अर्थव्यवस्था निर्मितीवर भर मुळात भाजप पायाभूत सुविधांच्या वाढीबद्दल बोलत असताना, प्रत्यक्षात कंत्राटदारांवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर काम करत आहे. आवडत्या कंत्राटदारांना कंत्राटे मिळतात मुंबई-गोवा/मुंबई-नाशिक/मुंबई-अहमदाबाद सारखे भयानक रस्ते बनवतात, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. जनता महागाईने ग्रस्त भाजप आणि त्यांच्या केंद्र सरकारकडून आपल्याला इतकी वाईट वागणूक मिळते, यात आपले पाप काय आहे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात राज्य परिवहन बस आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ झाल्याने सामान्य माणूस अजूनही त्रस्त आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा यासारख्या दैनंदिन बाजारपेठेत खरेदी करताना लोकांना अजूनही महागाईचा सामना करावा लागत आहे - शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी न करता, ते परवडणारे बनवण्यासाठी सरकारकडे काय उपाय आहे? असेही ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article