गझलकाराला कवीपेक्षा जास्त मेहनत करावी लागते:सानिका दशसहस्र यांना रंगत-संगत आणि करम प्रतिष्ठानचा गझल प्रतिभा पुरस्कार
2 hours ago
1
पुण्यातील पत्रकार भवनमध्ये रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्यातर्फे कवयित्री आणि गझलकार सानिका दशसहस्र यांना गझल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांनी 'या दिशहीन जगण्यास थारा हवा' आणि 'वर्तुळातल्या काट्यांवरती' या गझला सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, गझल लिहिताना शब्दांची मांडणी जाणिवपूर्वकपणे वृत्तात करावी लागते, त्यामुळे कवीपेक्षा गझलकारांना अधिक परिश्रम करावे लागतात. सानिका यांच्या गझला साध्या-सोप्या भाषेत असल्या तरी त्यात सखोल अर्थ दडलेला असतो. त्यांनी साहित्य संमेलनात गझलकारांसाठी स्वतंत्र कट्टा असावा, अशी मागणीही केली. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगितले. सानिका दशसहस्र यांनी हा त्यांचा पहिला गझल पुरस्कार असून यामुळे अधिक परिपक्व लेखनासाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमात करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर आणि प्रज्ञा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार वितरणानंतर झालेल्या गझल संमेलनात प्रभा सोनवणे, मिलिंद छत्रे, अमृता जोशी यांच्यासह अनेक कवींनी सहभाग घेतला. निरुपमा महाजन यांनी सूत्रसंचालन केले. कविता ही गृहिणी असेल तर गझल ही सम्राज्ञी असते. कविता लिहिणे सोपे आहे, परंतु गझल लिहिणे तितके सोपे नाही. गझलेने मराठी साहित्यासाठी मोठे काम केले आहे. परंतु अनेकदा तिला परका काव्यप्रकार असे म्हटले जाते. उर्दू साहित्यात गझल हा मुख्य लिहिण्याचा प्रकार आहे. उर्दू गझलेला मोठी परंपरा आहे. ती चटकन भावते तशीच मराठी गझल देखील भावायला पाहिजे. मराठी गझल एक दिवस विश्वावर सावली धरेल. जेवढी नजाकत उर्दू भाषेत आहे, त्यापेक्षा जास्त नजाकत आणि गोडी मराठी भाषेत आहे. असे मत ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य व कला मंडळ आयोजित आणि ज्ञानगंगा प्रकाशन पुणे प्रकाशित राजन लाखे लिखित 'गझलायन' या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी, ज्येष्ठ गझलकार अविनाश सांगोलेकर, हिमांशू कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, लेखक राजन लाखे उपस्थित होते. ए.के. शेख म्हणाले, चित्रपटांमुळे गझल घराघरात पोहोचली. येत्या काळात गझल सादर करण्याचे प्रमाण वाढायला हवे. ती वाटचाल राजन लाखे यांनी सुरू केली आहे. जेवढी नजाकत उर्दू भाषेत आहे, त्यापेक्षा जास्त नजाकत आणि गोडी मराठी भाषेत आहे. न.म. जोशी म्हणाले, गझल करणाऱ्या नवीन पिढीला ज्येष्ठ गझलकारांनी परखड मार्गदर्शन करायला हवे. योग्य मार्गदर्शन केले तरच रसिकांसाठी चांगल्या गझलांची निर्मिती होईल. हिमांशू कुलकर्णी म्हणाले, गझलकार व्याकरणात अडकून पडला, तर गझल लिहिता येत नाही. मनातून व्यक्त होणे म्हणजे गझल आहे. जर तुम्ही डोळ्यांनी ऐकले आणि कानांनी पाहिले तर तुम्ही कविता करू शकाल. गझल ही मनाच्या गाभ्यातून उमटलेली भावना असते. राजन लाखे म्हणाले, प्रेम हे कविता आणि गझल या दोन्ही मध्ये असते. प्रेमामध्ये हिशोब ठेऊन चालत नाही कवितेमध्ये कधी हिशोब असतो तर कधी नाही. परंतु, गझल ला हिशोब ठेवल्याशिवाय पूर्णत्व येत नाही. तो हिशोब शुद्धलेखन आणि मात्रांचा असतो, असे सांगत लाखे गझलेचे तंत्र स्पष्ट केले
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)