नांदुरी येथील ग्रामस्थांनी घेतला बारीपाडा गावासारखाच विकास करण्याचा ध्यास:पद्मश्री चैताराम पवार यांच्याकडून घेतले गाव विकासाबाबत मार्गदर्शन
3 hours ago
1
नांदुरी ग्रामपंचायतीच्या गावकऱ्यांनी साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील पद्मश्री पुरस्कार विजेते चैताराम पवार यांनी ३५ वर्षापासून केलेल्या जंगल संवर्धनाची सफर करत माहिती घेतली. यावेळी आपल्या नांदुरी येथेही जंगल संवर्धनाचा उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी पद्मश्री पुरस्कार विजेते चैताराम पवार यांनी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना गावात एकी ठेऊन राजकारण एका बाजूला ठेवत पंचसूत्री कार्यक्रम आखणे महत्वाचे असल्याचे सांगितले. जल, जंगल, जमीन, जनावर आणि जण असा हा पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतल्याने हे शक्य झाले. गावाच्या परिसरात चार हजार मोहाची झाडे असून प्रत्येक वर्षाला एका झाडापासून एक लाख रुपयांचे उत्पन्न गावास मिळत आहे. मोहाच्या झाडापासून मिळणाऱ्या फुलांचे मणुके, साबण, चॉकलेट, तेल, व्हॅसलीन या उपयोगी वस्तूंना देशासह परदेशातही मोठी मागणी असल्याचे सांगितले. जंगलात गावाच्या श्रमदानातून पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याने माती वाहून जाऊ नये, यासाठी ४२५ ठिकाणी दगडाच्या सोलिंग रचल्या आहेत. ३० हेक्टरमध्ये ८३४० झाडांचे जतन केले आहे. प्रत्येक झाडाला क्रमांक असल्याचे निदर्शनास आले. नांदुरीकरांनी केलेली बारीपाड्याची सफर प्रेरणादायी ठरली असून लवकरच ग्रामसभा घेत पंचसुत्रीचा अवलंब करणार आहे. बारीपाडा गावाला भेट दिल्याने जंगल संपत्तीचे महत्त्व समजले. गावातील नागरिकांनी बारीपाडा पॅटर्न राबवण्याचा संकल्प केल्याने जंगल सफर यशस्वी झाली. -सुभाष राऊत, माजी सरपंच, नांदुरी बारीपाडा येथील जंगल अभ्यास दौऱ्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन छान होते. प्रत्येक गावाने या बारीपाड्याला भेट दिली पाहिजे. गावाचे उत्पन्न वाढून जंगलाचा व गावाचा विकास केला पाहिजे. -वसंत गवळी, ज्येष्ठ नागरिक, नांदुरी
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)