नाथ, दत्त सांप्रदायाची मूळ शिकवण लोककल्याणाची:शंकर महाराज मठाचे संस्थापक माधव बाबा यांचे मत, पाथर्डीला नाथ सांप्रदायाची परंपरा‎

2 hours ago 2
कर्मकांडा बरोबरच सदाचरण करत धर्म प्रसार करायचा आहे. धर्मनाथ म्हणजे धर्माची कास धरा तेच तुमचे नाथ बनून रक्षण करते बनतील. नाथ सांप्रदाय, दत्त सांप्रदायाची मूळ शिकवण लोककल्याणाची आहे, असे मत शंकर महाराज मठाचे संस्थापक माधव बाबा यांनी व्यक्त केले. येथील दलित वस्तीत चैतन्य जालिंदरनाथांचे ठाणे आहे.या परिसरातील भाविकांनी या स्थानाचे सुशोभीकरण करत नाथ भक्तांच्या उपस्थितीत धर्मनाथ बीज उत्सव साजरा केला. शहरातील उद्योजक रवींद्र पाथरकर यांच्या हस्ते महापूजा व महाप्रसाद वाटप कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुळजवाडी संस्थानचे खताळ महाराज, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, बंडू बोरुडे, आत्माराम शास्त्री, सुवर्णकार संघटनेचे बाळासाहेब जिरेसाळ, राहुल टेके, चैतन्य सुडके, अॅड. नामदेव जायभाय, दत्तात्रय दारकुंडे आदी उपस्थित होते. माधव बाबा म्हणाले, पाथर्डी तालुक्याला नाथ सांप्रदायाची परंपरा आहे. संतभूमी म्हणून असलेली ओळख भाग्याने मिळाली आहे. या तालुक्यात जन्म घेणारी प्रत्येक व्यक्ती पूर्वजन्मीच्या सत्कर्मानेच जन्माला येते. एवढी शक्ती व ऊर्जा येथे आहे. अनेक अवतारी संत महंतांची कर्मभूमी तालुक्यात असल्याने संत परंपरा चालवताना प्राचीन मंदिरे व धर्म स्थळांच्या जीर्णोद्धाराकडेही लक्ष द्यावे. कष्टकरी व सर्वसामान्य कुटुंबातील दलित वस्तीतील भाविकांनी सुरू ठेवलेली परंपरा धर्म कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अलीकडील काळात शहरात शंकर महाराज मठाची वाटचालही सेवाभावी पद्धतीने सुरू आहे. त्यांच्या अधिष्ठानामुळे शहरात उपासकांची संख्या वाढत आहे. प्रास्ताविक विकास दिनकर यांनी, तर आभार संजय दिनकर यांनी मानले. पाथर्डी येथील चैतन्य जालिंदरनाथ मंदिरात माधव बाबा व नाथ भक्तांच्या उपस्थितीत धर्मनाथ बीज उत्सव साजरा करण्यात आला. नाथांची शक्ती सर्व शक्तिंपेक्षा सर्वश्रेष्ठ धर्माशिवाय जीवनाला अर्थ नाही. धर्माचरण करताना सत्याच्या मार्गावर चालताना पदोपदी ईश्वर आपले रक्षण करतो. धर्मनाथ बीज साजरी करण्यामागचा उद्देशच नाथकार्यासाठी साधकांनी तन-मन-धनाने कार्यरत होण्याचा संकल्प करावा असा आहे. नाथांची शक्ती सर्व शक्तिंपेक्षा सर्वश्रेष्ठ असून कलियुगात उपकारक ठरली आहे. येथील स्थानावर शहरवासीयांनी सेवा करत श्रद्धा व भक्तीचा संगम समाजात निर्माण करावा, असे माधव बाबा म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article