निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचा मतदानावरून सवाल:सायंकाळी 6 वाजेनंतरचा 76 लाख मतदानाचा तपशील द्या, नाना पटोले यांची मागणी

2 hours ago 1
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सायंकाळी ६ वाजल्यानंतर एकाएकी ७६ लाख मतदान कसे नोंदवले गेले, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पटोले यांनी स्पष्ट केले की, त्यांचा इव्हीएमवर आक्षेप नाही, मात्र मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात इतके मोठे मतदान कसे झाले, याबद्दल शंका आहे. त्यांनी भाजपवर थेट आरोप करत म्हटले की, या प्रश्नावर भाजपच्या पोटात दुखत असून दिवसाढवळ्या मतपेट्यांवर डाका टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर पटोले यांनी इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही भाष्य केले. पंतप्रधान मोदींच्या प्रयागराज कुंभमेळा दौऱ्यावर टीका करताना त्यांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंची नेमकी आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली. ओबीसी समाजाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली की, क्रिमीलेयरची अट घालून संवैधानिक आयोग नेमले असले तरी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सोय नाही. हा मुद्दा ते आगामी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी मंत्री नितीन राऊत यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या इच्छेबाबत विचारले असता, पटोले यांनी राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचे सांगून प्रश्नाला टाळले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article