भारतापासून 15 हजार किलोमीटरवर आहे एक ‘मिनी बिहार’!

3 hours ago 1

सुमारे 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी शेकडो भारतीयांना मजुरीसाठी सूरीनामला पाठवले होते. हे मजूर प्रामुख्याने बिहार व उत्तर प्रदेशचे होते. तेथील उसाच्या शेतांमध्ये मजुरी करण्यासाठी हे लोक तिकडे गेले. त्यांनी आपल्यासोबत भोजपुरी भाषा, भारतीय संस्कृती आणि परंपराही नेल्या व त्या कसोशीने जतनही करून ठेवल्या. पिढ्यान्पिढ्या त्यांचे असे जतन झाल्याने आजही सूरीनाममध्ये हा ‘भारत’ पाहायला मिळतो. त्यामध्येही बिहारी लोकांचे सणवार, भाषा तिथे ठळकपणे दिसते. सध्या सूरीनामच्या एकूण लोकसंख्येचा 30 टक्के भाग भारतीय वंशाच्या लोकांचा आहे. ते आजही भोजपुरी, हिंदी आणि संस्कृत भाषा बोलतात. त्यांच्या आहारात आजही वरण-भात, रोटी-भाजी, लोणचे, चटणी असे अस्सल भारतीय पदार्थ आहेत. त्यांच्या लग्नसमारंभात व सणावेळी आजही भारतीय संस्कृती दिसते. विशेष म्हणजे सूरीनामचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी शपथही संस्कृतमध्येच घेतली होती! सूरीनामच्या लोकांना क्रिकेट आवडते. तिथे बॉलीवूडचे चित्रपट व गाणीही अतिशय लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपट कलाकारांना ते डोक्यावर घेतात! दिवाळी, होळी, छठपूजासारखे अनेक सण ते उत्साहात साजरे करतात. सणावेळी हे लोक पारंपरिक भारतीय पोषाख परिधान करतात, मिठाई वाटतात. त्यांच्या भावविश्वात अर्थातच भारताला मोठे स्थान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article