मढी- मायंबा रोपवेसाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार:मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, संजीवन समाधी मंदिराचे भूमिपूजन‎

2 hours ago 1
नाथ संप्रदायाने देशाला भक्तीतून मुक्तीचा मार्ग दाखवला. गुरुदेव दत्तांच्या आशीर्वादाने देशातील सर्वात मोठी परंपरा नाथ संप्रदायाच्या रूपाने कानाकोपऱ्यात पोहोचली. मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मढी-मायंबा रोप-वेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी मंदिराच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. मोनिका राजळे, विवेकानंद शास्त्री महाराज आदी उपस्थित होते. विकासकार्यात विशेष योगदान देणाऱ्या संतोष छाजेड, पुण्याचे वसंत शेडगे व अविनाश बलकवडे, नगरचे बाबासाहेब डाके आदींचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज होते. प्रास्ताविकात आ. सुरेश धस म्हणाले, की नाथांच्या पंढरीत राज्याचे बाहुबली मुख्यमंत्र्यांचे आगमन भाविकांना सुखावणारे आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी आपण देवस्थानामध्ये लक्ष घालत विविध विकासकामांचा वेग वाढवला. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी विकासकामासाठी दिलेले २२ कोटी रुपये रस्त्यांच्या प्रमुख कामासाठी खर्च झाल्याने गडाकडे येणारे सर्व रस्ते अत्यंत सुस्थितीत झाले आहेत. घाटरस्त्याचे पाच किमी अंतर वाचेल मढी ते मायंबा हे १० किमी अंतर आहे. या दोन्ही देवस्थानदरम्यान रोप-वे झाल्यास ५ किमी घाटरस्त्याचे अंतर वाचणार आहे. मायंबा देवस्थानला डोंगर चढून जाण्यासाठी सुमारे ३७५ पायऱ्या आहेत. ज्येष्ठांसह आजारी व्यक्तींना या पायऱ्या चढून जाणे शक्य होत नाही. दळणवळणासाठी रोप-वे हा सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. असा रोपवे झाल्यास दोन्ही देवस्थानांवर भाविकांची गर्दी वाढणार आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही देवस्थान समित्यांचे प्रयत्न शासनदरबारी सुरू आहेत. मढी देवस्थान नगर जिल्ह्यात, तर मायंबा देवस्थान बीड जिल्ह्यात येते. सर्वसाधारणपणे १२०० फूट उंचीवर मच्छिंद्रनाथांचे समाधी मंदिर असून, त्यासाठी मढी मंदिरापासून सुमारे एक किमी पुढे उंच टॉवर बांधूनच रोपवे करावा लागणार आहे. शिष्टमंडळासोबत मीही येईल : फडणवीस यात्रा कालावधीत मढी, मायंबा येथे मोठी गर्दी होते. रोप-वेचा विषय मंत्री गडकरी यांच्या हातात आहे. त्यांच्याकडे विश्वस्तांचे शिष्टमंडळ घेऊन जाऊ, त्याबरोबर मी स्वतः येईल. गडकरींकडून निश्चितच त्याला मान्यता मिळेल. कुंभमेळ्यामध्ये ४५ कोटी लोकांनी गंगा स्नान केले. पाश्चिमात्य राष्ट्राच्या एका लोकसंख्येएवढ्या भाविकांनी हजेरी लावली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article