अकोले विधानसभा मतदारसंघातमहायुतीमध्ये अंतर्गत राजकारण तापलेअसून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूआहेत. नुकतेच अजित पवार यांनीअकोल्यातून महायुतीची उमेदवारीआमदार डॉ. किरण लहामटे यांनाजाहीर केली. त्यावर भाजपचे नेतेमाजी आमदार वैभवराव पिचडम्हणाले, आमदार डॉ. किरण लहामटे हेबालिश आमदार आहेत. तर वैभवपिचड हा फ्रस्ट्रेट झालेला माणूस,त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,अशी टीका डॉ. किरण लहामटे यांनी केली. आजमितीस आमदार बाळासाहेबथोरात हे राज्यातील काँग्रेसचे वपर्यायाने मविआचे मातब्बर नेते आहेत.त्यामुळे त्यांची मदत मविआच्याउमेदवारास होईल, हे स्पष्ट आहे. अशापरिस्थितीत महायुतीचा उमेदवारनिवडून आणण्यासाठी महायुती घटकपक्षांतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनाशिकस्त करावी लागेल. महायुतीधर्मपाळून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीयेथील मतदारांपर्यंत पोहोचून ती मतेआपल्याच पारड्यात कशी पडतील,याबाबत व्यूहरचना ठरवावी लागेल.महायुतीतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनाजाहीरपणे, मला तुझी गरज नाही. मीतुझ्याकडे मते मागायला येणारच नाही,अशा घमेंडीत राहणारे उमेदवारनिश्चित अडचणीत सापडेल. ९ ऑक्टोबर रोजी आद्यक्रांतिकारकवीर राघोजी भांगरे जलाशय नामकरण कार्यक्रमात महायुतीतील भाजपचेइच्छुक उमेदवार माजी आमदार वैभव पिचड यांच्या प्रतिक्रियेवर राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यात राजकीय तिरंदाजीपहायला मिळाली. पिचडांनी आमदारडॉ. लहामटे हे बालिश आहेत, असेसंबोधले व आपल्याला भाजपाकडूनउमेदवारी मिळण्याबाबत वरिष्ठांकडूनसकारात्मक आहे. मला उमेदवारीमिळाल्यास महायुतीधर्म पाळून डॉ.किरण लहामटे यांच्याकडे मी मदतमागेल, असे सूचवले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतानाआमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले,काय झाले, वैभव पिचड हा फ्रस्ट्रेटझालेला माणूस आहे. मागच्याविधानसभेत त्याला ५५ हजारांचाआकडा पार करता नाही आला.त्यावेळेला त्याची मनःस्थिती पारबिघडली होती. आता मधी आमच्याचकाही कलाकारांनी दूध संघात त्यालावाचवले. आता परत तिकीटाचा वादअसल्याने मनःस्थिती बरोबरनसल्यामुळेच ते काहीही विधानकरतात, त्याच्याकडे लक्ष देण्याचीगरज नाही. महायुतीतील शिंदेशिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुखबाजीराव दराडे यांनी १० ऑक्टोबररोजी महाराजा लाॅनवर झालेल्याशिवसैनिक मेळाव्यात डॉ. लहामटेयांना पुन्हा उमेदवारीदिल्यासकोणत्याही परिस्थितीतशिवसैनिक त्यांचा पराभव करतील,असा इशारा राज्य सचिव भाऊसाहेबचौधरी व संपर्कप्रमुख राजेंद्र चौधरीयांच्यासमोर दिला. आजून वेळ गेलेलीनाही, महायुतीचा अजित पवार यांनीजाहीर केलेला उमेदवार बदला,अन्यथा महायुतीच्या उमेदवाराचाआजच पराभव झाला म्हणून समजा,असे सांगितले. महायुतीच्या संदोपसुंदीवर मविआकडून चुप्पी महायुतीतील या सुंदोपसुंदी राजकारणावर अद्यापपर्यंत मविआकडून कोणत्याचप्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेल्या नाहीत, पण मतभिन्नतेचे वातावरणमहायुतीतील घटक पक्षांतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमधे शांत झाले नाही.महायुतीधर्म पाळला गेला नाही, तर अंतर्गत वादातून पक्षांतर्गत संघर्ष अधिकउफाळून येईल. हे राजकीय रणकंदन शांत होण्यावरच महायुती उमेदवाराचेआमदारीचे भवितव्य अवलंबून असेल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)