राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 निर्णय:अभय योजनेस मुदतवाढ, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जलाशय प्रकल्पांसाठी निधीची तरतूद

2 hours ago 1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. जलसंपदा, मृद व जलसंधारण आणि महसूल विभागातील हे निर्णय आहेत. यातील दोन निर्णय हे पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी आहेत. तर एक निर्णय हा महसूल विभागासंदर्भात असून अभय योजनेस एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या 25 प्रकल्पांसाठी 170 कोटी रुपयांच्या तरतूदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा निर्णय मृद व जलसंधारण विभागाकडून घेण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील टेमघर प्रकल्पाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामे व धरण मजबुतीकरणाच्या कामांसाठी 315 कोटी 5 लाख रूपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अभय योजनेस 1 वर्षाची मुदतवाढ तिसरा निर्णय हा राज्याच्या महसूल विभागाअंतर्गत घेण्यात आला असून शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टयाने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article