संडे बिग स्टोरी:लाडक्या बहिणींचे अपेक्षित‎ अर्ज 6 लाख; पण आले 10 लाखांवर‎; महिला मतदारांपैकी 67 टक्के झाल्या ‘लाडक्या’‎

2 hours ago 1
केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची‎एकूण लाभार्थी संख्या लक्षात घेता‎‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’‎योजनेंतर्गत सहा लाखांपर्यंत अर्ज‎जिल्हा प्रशासनाला अपेक्षित होते.‎मात्र, अर्जांची संख्या १० लाखांवर‎गेली आहे. लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची‎पडताळणी झालेली नाही. परिणामी‎अडीच लाखांवर उत्पन्न असलेल्या‎महिलांनीही अर्ज केल्याची शक्यता‎नाकारता येत नाही.‎ जिल्ह्यात २१ ते ६५ वयोगटातील‎१४,९७,०४५ महिला मतदारांपैकी‎९,९०,६२३ (६६.१७%) महिलांचे‎लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज‎मंजूर झाले आहेत. या वयोगटातील‎४,९५,११९ (३३.८३%) महिलांनी ‎‎योजनेसाठी अर्ज केलेले नाहीत. २१‎ते ६५ वयोगटातील कुटुंबाचे एकत्रित ‎‎उत्पन्न २.५० लाख रुपयांच्या आत ‎‎असलेल्या महिलांसाठी योजना‎आहे. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न‎त्यापेक्षा जास्त असलेल्या महिला या ‎‎योजनेसाठी अपात्र आहेत.‎ ६६.९२% महिलांचे उत्पन्न‎२.५० लाखांच्या आत‎ जिल्ह्यात २१ ते ६५ वयोगटातील एकूण‎१४,९७,०४५ महिला मतदारांपैकी ६६.९२‎म्हणजेच १०,०१,९२६ महिलांच्या कुटुंबाचे‎एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाखांच्या‎आत असल्याचे या योजनेतून समोर‎आले. महिलांनी तसे हमीपत्र अर्जासोबत‎भरून दिले आहे. योजनेसाठी अर्ज न‎केलेल्या ४,९५,११९ महिलांनी कुटुंबाचे‎एकत्रित उत्पन्न २.५० लाखांपेक्षा अधिक‎असल्याने अर्ज केलेले नाहीत असे दिसते.‎ ४ लाख अर्ज आले जास्त‎ कुटुंबाचे एकत्रित वर्षिक उत्पन्न २.५०‎लाखांच्या आत असल्याच्या हमीपत्रावरून‎जिल्हास्तरीय समितीने लाडक्या बहिणींचे‎अर्ज मंजूर केले आहेत. त्यांच्या‎उत्पन्नाबाबत पडताळणी झालेली नाही.‎लाडकी बहीण योजनेंतर्गत जास्तीत जास्त‎सहा लाखांपर्यंत अर्ज जळगाव जिल्हा‎प्रशासनाला अपेक्षित होते. मात्र, अर्जांची‎संख्या १० लाखांवर गेली.‎ पुढे काय? : निकष‎बदलण्याची चिन्ह‎ विधानसभा निवडणुकीच्या‎पार्श्वभूमीवर लाडकी बहीण‎योजना राबवण्यात आली.‎जास्तीत जास्त महिलांना या‎योजनेचा लाभ देण्याबाबत‎मुख्यमंत्री, मंत्र्यांकडून आदेश‎देण्यात आले. विरोधकांनी‎सरकारवर टीका केली. योजनेचे‎पैसे परत घेणार नसल्याचे‎सत्ताधाऱ्यांनी सांगितले. मविआने‎सत्तेत आल्यानंतर योजनेचा‎लाभ २ हजारांपर्यंत वाढवण्याचे‎जाहीर केले. मतांच्या गणितामुळे‎आगामी काळात अपात्र झालेल्या‎लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची‎शक्यता कमीच आहे. मात्र, पीएम‎किसान योजनेप्रमाणे निकष‎बदलवून लाभार्थी संख्या कमी‎केली जाऊ शकते; परंतु अपात्र‎लाभ वसूल केला जाईल, असे‎प्रशासनाला वाटत नाही.‎ अडीच लाखांवर उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केल्याची शक्यता‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article