एमआयटी विद्यापीठाचा 'भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार' सोहळा:डॉ. अभय बंग यांच्यासह चार विद्वानांना सन्मान; प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे पारितोषिक
3 hours ago
1
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या वतीने आयोजित भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२५ चा प्रदान सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि सर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात चार प्रमुख व्यक्तींना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयआयएम अहमदाबादचे संचालक प्रा. भरत भास्कर यांना 'भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार', डब्ल्यूएचओच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना 'भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार', तर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री आणि संगीतकार शेखर सेन यांना 'भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार' देण्यात आला. प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप अडीच लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि आबुधाबी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. तईब कमली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. अभय बंग यांनी आपल्या भाषणात देशातील ११ कोटी नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आणि लोकसेवेसाठी जीवन समर्पित करण्याचे आवाहन केले. त्यांनी हा पुरस्कार गडचिरोलीतील सर्व नागरिकांना समर्पित केला. डॉ. माशेलकर यांनी तरुणांना सकारात्मक कार्यासाठी आपली ऊर्जा वापरण्याचे आवाहन केले. फाउंडर्स डे निमित्त डॉ. विश्वनाथ कराड यांचा घोंगडी, तुकाराम महाराजांची पगडी, सायटेशन्स ऑफ ऑनर आणि वीणा देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)