दिल्लीतला टॉर्च बंद झाला की हे अंधारात कुठे जातील?:काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणारही नाही, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका

2 hours ago 3
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन कार्य अहवालाचे विमोचन केले. यावेळी त्यांनी उपस्थितीतांशी संवाद साधला. यावेळी भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीतला टॉर्च बंद झाला की हे अंधारात कुठे जातील?, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. दिल्लीतला टॉर्च बंद झाला की अंधारात हे कुठे जातील? उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या हातात काहीही नाही तरीही आपली शिवसेना खरी आहे. आपल्याला शिवसेना प्रमुख म्हणाले होते ते आपल्याला करायचे आहे. नोकऱ्या मागणारे होऊ नका नोकऱ्या देणारे व्हा. पदे मागणारे होऊ नका, पदे देणारे व्हा. यांचे आयुष्य जे मिंध्याचे अरे काजवाही एवढासा असला तरीही स्वयंप्रकाशित असतो, हे स्वयंप्रकाशित कुठे? यांच्यावर तिकडून टॉर्च मारत आहेत तोपर्यंत हे दिसत आहेत. दिल्लीतला टॉर्च बंद झाला की अंधारात हे कुठे जातील? त्यानंतर त्यांच्याबरोबर जे गेले आहेत त्या काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणार नाही. यांचे भवितव्य बिकट आहे. काही मिळाले तर आम्ही खुश नाहीतर आम्ही रुसूबाई रुसू उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पुण्यात जीबीएस नावाचा रोग पसरतो आहे. तो रोग दुषित पाण्यामुळे पसरतो आहे. उत्तर द्यायला महापालिका कुठे आहे? ती विसर्जित झाली आहे. भाजपकडेच पुणे महापालिका होती. जा मग नगरविकास खात्यात जे धेंड बसवले आहे ना त्याला विचारा. काही मिळाले नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस, पुणेकरांना दुषित पाण्यातून रोग होत आहेत, जबाबदार कोण? मंत्री असणार, दुसरा कोण? आम्हाला काही मिळाले तर आम्ही खुश नाहीतर आम्ही रुसूबाई रुसू, पण जनता शांत आहे, जनता पेटली तर तुमच्या घरात घुसू हेच म्हणेल. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीत हार-जीत होत असते. पण आपली हार झालेली नाही. कारण लोकांच्या मनात आजही आपण आहोत. मी गद्दारांना सांगू इच्छितो तुम्हाला तानाजी मालुसरे होता आले नाही शिवाजी महाराज तर सोडूनच द्या. बाजीप्रभू देशपांडे होता आले नाही. पण तुम्ही खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ झालात कारण ते होणे सोपे असते. ही दोन्ही घेतली तरीही गद्दारच म्हणतो, यांना चारशे वर्षे झाली तरीही त्यांचा गद्दारीचा शिक्का पुसला जात नाही, यांचा गद्दारीचा शिक्का कधी पुसला जाणार?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. लाडकी बहीण योजनेवर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आता येताना बातमी वाचली पाच लाख महिलांना अपात्र केले, मत मिळाली आता अपात्र. या महिलांनी जाऊन तीन-तीन भावांना विचारले पाहिजे आम्ही का अपात्र? तेव्हा भाऊ गर्दी झाली होती. जॅकेट भाऊ हा भाऊ, तो भाऊ. दीड दीड हजार रुपये देऊन मत दिली, अशी टीका केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article