मराठी भाषा अजून जिवंत आहे:पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनात मुलांचा उत्स्फूर्त सहभाग, वाचन संस्कृती वाढवण्याचे आवाहन
3 hours ago
1
पुण्यातील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणात नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहून मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल आशादायी चित्र दिसले. प्रमुख बालसाहित्यिका स्वाती राजे यांनी समारोप समारंभात बोलताना सांगितले की पुस्तक हातात घेतल्यावरच माणूस खऱ्या अर्थाने अंतर्मुख होतो आणि चिंतनाची प्रक्रिया सुरू होते. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनात वाचन, मनन आणि चिंतन या ज्ञान मिळवण्याच्या तीन महत्त्वाच्या पायऱ्यांवर विशेष भर देण्यात आला. संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात यांनी मुलांमध्ये साहित्याची गोडी वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे यांनी पालकांना मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तके देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात बाल अभिनेता शर्व गाडगीळ, राष्ट्रसेवा दलाचे सचिव शिवाजी खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात आयोजित विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले, तर विनोद वाघ यांनी आभार मानले. मराठी भाषा येत नाही मराठी भाषा संपत आहे असे म्हणतात, परंतु दोन दिवसात मोठ्या संख्येने मुले साहित्य संमेलनात आली ते पाहून विश्वास वाटतोय की मराठी भाषा अजूनही संपलेली नाही. फक्त आपल्या हृदयात डोकावून त्याचे मेंदूशी नाते जोडायला पाहिजे. पुस्तक हातात येते तेव्हा आपण अंतर्मुख होतो आणि माहिती मिळून चिंतनाची प्रक्रिया होते. वाचन, मनन, चिंतन या ज्ञान मिळवण्याच्या ३ पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढल्यानंतरच माणूस शहाणा होतो, असे मत बालसाहित्यकार स्वाती राजे यांनी व्यक्त केले. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले होते. साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे सचिव शिवाजी खांडेकर, शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे, बाल अभिनेता शर्व गाडगीळ, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अण्णा थोरात म्हणाले, मुलांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी, यासाठी साहित्य संमेलना सारखे कार्यक्रम व्हायला हवेत. यानिमित्ताने शालेय विद्यार्थी भाषेच्या आणखी जवळ आले आणि साहित्यातले विविध पैलू त्यांना जवळून अनुभवता आले. मराठी साहित्य जगण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. राजन लाखे म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा आधी पुस्तके द्यावीत. विद्यार्थ्यांनी देखील मोबाईल वापरताना किती वापरायचा याची मर्यादा ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. शर्व गाडगीळ आणि शिवाजी खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. विनोद वाघ यांनी आभार मानले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)