मुलाला निवडून आणता आले नाही अन् आम्हाला गप्पा मारता:ईव्हीएमला दोष देण्यात काय अर्थ? अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
2 hours ago
2
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि सरकार महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र, या विजायवार महाविकास आघाडीने प्रश्न उपस्थित केले आहेत. याच सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मनसेच्या मेळाव्यात विधानसभेच्या निकालावर भाष्य करताना, लोकांनी आपल्याला मते दिली पण ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही, असे विधान केले होते. तसेच ईव्हीएमच्या घोळामुळेच महायुतीचा विजय झाला, असेही राज ठाकरे यांनी म्हंटले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, राज ठाकरे यांचे कार्यकर्ते डी-मॉरलाईज झाले आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर टिका केली आहे. लोकसभेला आमच्या फक्त 17 जागा आल्या, तेव्हा आम्ही रडत बसलो नाहीत. तुम्हाला तुमच्या मुलगा निवडून आणता आलं नाही, तुम्ही आम्हाला गप्पा मारता. त्यावेळी, आम्ही मेहनत केली, कष्ट घेतले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, एका निवडणुकीत मलाही माझ्या मुलाला निवडून आणता आले नाही, मलाही माझ्या पत्नीला निवडून आणता आले नाही. त्यामध्ये, ईव्हीएमला दोष देण्यात काय अर्थ आहे, असा पलटवार अजित पवारांनी केला. तसेच, तुम्हाला मते गेली नाहीत, मग गेली कुठे मतं?, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. अजित पवारांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, राहुल गांधी यांनी तपासणीसाठी स्वतःची टीम लावावी, 8 तारखेला दिल्लीचा निकाल आहे, म्हणून त्यांचे रडगाणे सुरु आहे. असे म्हणत अजित पवारांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सुप्रिया सुळे यांना देखील टोला लगावला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषिविभागात झालेल्या भ्रष्टाचारावर आरोप केले आहेत. यावर देखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कारवाई होणार नाही. अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांनी आपली बाजू मांडली आहे, त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर, कारवाई केली जाईल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)