रमाई महोत्सवात हास्याचा धबधबा:कवी कोळपकर-दीक्षित यांच्या कविता-किस्स्यांनी श्रोत्यांना खळखळून हसवले
2 hours ago
1
पुणे - महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आडकर फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित रमाई महोत्सवात हास्यमैफलीने रंगत आणली. कार्यक्रमात प्रसिद्ध कवी भालचंद्र कोळपकर आणि अनिल दीक्षित यांनी त्यांच्या विनोदी कविता आणि किस्स्यांनी श्रोत्यांना खळखळून हसवले. कवी कोळपकर यांनी 'बुलेट प्रेम', 'हीरोइन', 'भांडण', 'लाजरे पोरा' आणि 'बाप झाल्यावर' या विविध विषयांवरील कविता सादर केल्या. त्यांनी अभ्यास सोडून प्रेमात पडणाऱ्या तरुणांची फजिती, हिरोईनशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकाची कहाणी, नवरा-बायकोच्या भांडणाचे महत्त्व आणि मोबाईलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मार्मिक टीका केली. अनिल दीक्षित यांनी नोटबंदीवरील विडंबन काव्य, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या 'पत्रात लिव्हा' कवितेचे विडंबन करत शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांनी भीमगझल आणि भीमगीताने कार्यक्रमाची सांगता केली. महोत्सवाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी रमाई महोत्सवाची माहिती दिली, तर कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी या महोत्सवाचे सर्वसमावेशक स्वरूप स्पष्ट केले. दरवर्षी प्रसिद्ध कलाकारांना या मंचावर आमंत्रित करून त्यांच्या कलेचे सादरीकरण केले जाते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)