संडे बिग स्टाेरी:झाडांची कत्तल करून पेटवल्या भट्ट्या, काेळसा करून हाॅटेल, ढाब्यांना पुरवठा; साेलापूर-पुणे महामार्गावर बाळ्याजवळ बेकायदा कृत्य

2 hours ago 1
शहरातील बाळे परिसरात बेकायदा काेळसाभट्ट्या सुरू झाल्या अाहेत. झाडांची कत्तल करून काेळसा तयार करणे अाणि महामार्गावरील हाॅटेल, ढाब्यांना ताे पुरवणे असा हा गाेरखधंदा अाहे. त्याने झाडांची माेठ्या प्रमाणात कत्तल सुरू झाली अाणि वनविभागाचे त्याकडे साफ दुर्लक्ष झाले. अातापर्यंत शेकडाे झाडांची कत्तल झाल्याचे परिसरातील पाहणीतून दिसून येते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने कोळसा भट्ट्यांवर बंदी घातली. त्याची वाहतूक, साठवणूक यावर देखील निर्बंध अाले. परंतु वनविभाग कारवाईचा केवळ दिखावा करत अाहे. बाळे परिसरातल्या महामार्गालगत क्षेत्रात कोळसा तयार करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील १० कुटुंबीयांनी पालं उभारली. गणेश नावाच्या कोळसा व्यावसायिकाने या मजुरांना गेल्या वर्षी रायगड येथून सोलापुरात आणले. झाडे तोडून त्यापासून ३० ते ३८ किलोचे एक पोतं कोळसा करून दिल्यावर मजुरांना १५० रुपये मजुरी मिळते. आतापर्यंत तयार झालेला कोळसा गणेश हाच वाहनातून घेऊन जाताे, अशी माहिती मिळाली. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्यांत कोळसा भट्टी लावण्याचे प्रकार वाढले. अाता थेट शहरातच झाडे तोडून कोळसा तयार करण्याचा प्रकार वाढला. वन कायदा, नियम काय सांगतो? शासनाच्या १९८७ च्या आदेशान्वये राखीव व संरक्षित वनक्षेत्र परिसरासह इतर ठिकाणी लाकडापासून कोळसा तयार करण्यावर पूर्णत: निर्बंध आहेत. २०१४ मध्ये सुधारित वन नियमाली (कलम ५३) अाली. त्याने काही सुधारणा अंमलात अाल्या. उत्पादित झालेला कोळसा हे वनोपज असल्याने त्याची वाहतूक व साठवणुकीसाठी रीतसर परवानगी बंधनकारक असल्याचे त्यात म्हटले अाहे. परवानगी दिलेली नाही काटेरी झाडे तोडण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. पण, त्यापासून कोळसा तयार केल्यास ते वन उत्पादन होते. त्यासाठी परवाना आवश्यक आहे. - अजित शिंदे, प्र. उपवनसंक्षक सोलापूर भट्टीतील धुराचा नागरिकांना त्रास विशिष्ट पद्धतीने लाकूड रचतात. त्यावर गवत, गोणपाट अंथरतात. थेट हवेच्या संपर्कात न आणता ती लाकडे पेटवून कोळसा तयार करतात. धुपणाऱ्या त्या भट्टीतून बाहेर पडणाऱ्या धुराचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका अाहे. औद्योगिक वसाहतीच्या तुलनेत तो धूर कमी असतो, असा जावईशोध लावत वन कर्मचाऱ्यांसह इतर संबंधित यंत्रणांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. कर्नाटकातून अाणल्याचे दाखवतात कर्नाटकात कोळशाचे उत्पादन, वाहतुकीवर निर्बंध नाहीत. साेलापूरच्या सीमेवरील वनोपज नाकावर महाराष्ट्रात वाहतूक परवानगीचा पास घेऊन, आपल्याच जिल्ह्यात तयार झालेला कोळसा कर्नाटकातून आणला, असे दाखवले जाते. ही केवळ चलाखी अाहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article