अजित पवारांच्या आमदाराचा रोहित पवारांना टोला:ज्यांना कधी लंगोट घालण्याचे माहिती नाही, त्यांनी कुस्तीवर बोलू नये

3 hours ago 1
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली आहे. यंदाची ही स्पर्धा चांगलीच गाजली होती. पंचाने चुकीचा निर्णय दिल्याने दोन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेला शिवराज राक्षेचा पराभव झाला असल्याचा दावा केला जात आहे. या स्पर्धेवर आमदार रोहित पवार यांनी देखील टीका केली होती. नव्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे आयोजन करावे तसेच ही स्पर्धा शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अहिल्यानगर येथे झालेल्या या स्पर्धेत पैलवानांचा मान-सन्मान राखण्यात आला नसल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला होता. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या या आरोपांवर अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी पलटवार केला आहे. तुम्ही अजित दादांशी निगडीत आहात म्हणून आम्ही थोडा मान-सन्मान राखतो, पण याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. ज्यांना कधी लंगोट घालण्याचे माहिती नाही, त्यांनी कुस्तीवर बोलू नये, असे म्हणत संग्राम जगताप यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर टीका करताना म्हणाले होते, महाराष्ट्र केसरी ही पैलवानांसाठी होती की राजकीय नेत्यांसाठी होती, असा सवाल उपस्थित केला होता. तसेच पैलवानांचा योग्य मानसन्मान झाला नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर देखील संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, आत्तापर्यंतच्या कुस्ती स्पर्धेत कोणी हभप महाराज नव्हते, किंवा कोणी क्रिकेटमधील व्यक्ती नव्हात. सर्व राजकीय माणसांनीच ही कुस्ती स्पर्धा पुढे नेली. अलिकडच्या काळात नव्याने राजकारण येणाऱ्यांना मी लगेचच महाराष्ट्रात पुढे गेले पाहिजे, म्हणून ते काहीही बोलतात. पण, थोडा वेळ लागेल, गडबड न करता सगळे करावे. आम्ही अजित दादांमुळे पडद्याआड घालतो, त्यांचा मान-सन्मान राखला जातो. रोहित पवार काय म्हणाले होते? रोहित पवार म्हणाले होते की, अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी कुस्तीचे आयोजन हे पैलवानांसाठी होते की नेत्यांसाठी हेच कळत नव्हते तिथे पैलवान कमी, पंच कमी आणि नेतेच जास्त होते. ती कुस्ती कुठल्यातरी पैलवानाला जिंकवण्यासाठी घेतली होती का काय हे कळत नव्हते. जो निकाल लागला यामध्ये सुद्धा पैलवानावर अन्याय झाला, हे सगळे योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा परिषदेच्या माध्यमातून शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली कर्जत जामखेडमध्ये घ्यावी अशी मी विनंती केली आहे. कुठल्याही पैलवानाला जिंकवण्यासाठी आम्ही ही स्पर्धा घेणार नाही. जर ही गोष्ट मान्य केली तर खरी महाराष्ट्र केसरी मार्च अखेर आपल्याला बघायला मिळेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article