ईश्वरचिठ्ठीने भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा हात:भाजपचे उमेश पाटील निवडणुकीदरम्यान गायब, नाना पटोलेंचे नशीब जोरावर
2 hours ago
3
नाना पटोले यांचे नशीब सध्या जोरावर असल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ईश्वराने देखील नाना पटोले यांना साथ दिली आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत नरेश ईश्वरकर, आनंद मल्लेवार, अनिता नलगोकुलवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य ईश्वरचिठ्ठीने विजयी झाले. काँग्रेसच्या शीतल राऊत यांनाही निवडणुकीमध्ये याच ईश्वरचिठ्ठीने साथ दिली. भाजपचे उमेश पाटील निवडणुकीदरम्यान गायब होते. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीमध्ये यश मिळवणे सहज शक्य झाले. भंडारा जिल्ह्यामध्ये अध्यक्षपद स्वतःहून भाजपकडे चालून आले होते. मात्र हे पद भाजपला स्वतःकडे कायम ठेवता आले नाही. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष काँग्रेसचा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्ष पद गेले. मात्र त्यानंतर पूर्ण फासे फिरले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे मिळून पाच सदस्य गायब झाले. त्यांनी महायुतीचा पूर्ण 'गेम' केला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये नाना पटोले यांची कॉलर आणखी 'स्टाईट' झाली आहे. अख्खी जिल्हा परिषदच महायुतीच्या हातून निघून गेल्याने अनेकांना आता मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या या पराभवाला कोण कारणीभूत आहे? याचा शोध आता वरिष्ठ नेत्यांना घ्यावा लागणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले नाही. भारतीय जनता पार्टीचे नेतेच घरचे भेदी ठरले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीला गंभीर देणे आत्मपरीक्षण करण्याची गरज भासणार आहे. या आत्मपरीक्षणानंतर गरज पडल्यास मोठे ऑपरेशन भारतीय जनता पार्टीला करावे लागेल. प्रसंगी काही नेते देखील बदलावे लागणार आहेत. भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला यश मिळाले नाही. त्यात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच घरचे भेदी ठरले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीला गंभीरपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज भासणार आहे. या आत्मपरीक्षणानंतर गरज पडल्यास मोठे ऑपरेशन भारतीय जनता पार्टीला करावे लागेल. प्रसंगी काही पदाधिकारी देखील बदलावे लागणार आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सक्षम करण्यासाठी नेते दिवस-रात्र एक करीत आहेत. आपल्या रक्ताचे पाणी करीत आहेत. परंतु पदाधिकाऱ्यांना याचं गांभीर्य वाटत नाही. त्यांच्याच चुकीमुळे भंडारा जिल्हा परिषद हातून निघून गेल्याचं आता बोललं जात आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)