कृषी पणन मंडळाला मंत्र्यांचे निर्देश:शेतकऱ्यांसाठी पणन सुविधा बळकट करा, बापगाव निर्यातक्षम हब म्हणून विकसित करणार
2 hours ago
2
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महत्वपूर्ण निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. मंत्री रावल यांनी बापगाव, काळडोंगरी, जाधववाडी आणि तळेगाव दाभाडे येथील प्रकल्पांचा विकास वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले. विशेषतः बापगाव येथे निर्यातक्षम हब विकसित करून स्मार्ट योजना राबवण्याचे निर्देश दिले. तळेगाव दाभाडे येथे 'आंतरराष्ट्रीय फुल बाजार' निर्माण करण्याची कार्यवाही वेगवान करण्यास सांगितले. काजू फळपीक विकास योजनेअंतर्गत 1000 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारणीचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या आकाराची स्क्रीन बसवून लिलाव भावांची माहिती प्रदर्शित करण्याचे आदेश दिले. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील 16 नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या ई-नाम प्रणालीशी जोडल्या जाणार आहेत. यामुळे देशभरातील बाजार समित्यांशी संपर्क साधता येईल आणि शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळेल. बैठकीला आमदार चरणसिंह ठाकूर, सहकार आयुक्त दीपक तावरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी पणन संचालक विकास रसाळ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)