धनंजय मुंडेंचा पापाचा घडा भरत आला:त्यांनी आता तरी आरोप मान्य केले पाहिजे, कोर्टानेच दोषी ठरवले; तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया

2 hours ago 1
धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरत आला. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. मुंडेंनी आता तरी आरोप मान्य केले पाहिजे. कोर्टानेच त्यांना दोषी ठरवले आहे, असेही त्या म्हणाल्या. मंत्री धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी वांद्रे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्या विरोधात करुणा शर्मा-मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे करुणा शर्मा-मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. करुणा शर्मा-मुंडे यांनी धनंजय मुंडेंविरोधात कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले. आता धनंजय मुंडे यांनी करुणा यांना दरमहा 1 लाख 25 हजार तर त्यांची मुलगी शिवानी हिला दरमहा 75 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आधीच आरोपांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना आता करुणा मुंडेच म्हटले पाहिजे तृप्ती देसाई म्हणाल्या, खरे तर करुणा शर्मांना न्याय मिळाला असे म्हणावे लागेल. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. माझ्यावर घरगुती हिंसाचार झाला आहे. मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. मला खर्च दिला जात नाही, असे करुणा शर्मा वारंवार सांगत होत्या. कोणतीही दखल घेतली नसल्याने त्या न्यायालयात गेल्या. कोर्टाने आज त्यांना न्याय दिला. त्यांची पोटगी असेल किंवा महिन्याला त्यांच्या मुलीचा खर्च असेल तो देण्याचे मान्य केले आहे. मुंडेंनी आता तरी आरोप मान्य केले पाहिजे. कोर्टानेच त्यांना दोषी ठरवले आहे. करुणा शर्मा या मी करुणा शर्मा नाही तर करुणा मुंडे आहे, असे सांगायच्या. त्यामुळे त्यांना आता करुणा मुंडेच म्हटले पाहिजे, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली. आता पापाचा घडा भरत आला तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. हे गंभीर प्रकरण आहे. आतापर्यंत धनंजय मुंडेंनी राजकीय दबावापोटी आणि पदाचा गैरवापर करत अनेक कृत्य केली आहेत. मला वाटते आता पापाचा घडा भरत आला आहे. खंडणी प्रकरणातही मुंडेंचीच माणसे आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे, हे सर्वांना माहीत आहे. ही टोळी त्यांच्या जवळची होती, हे माहीत आहे. त्यामुळे मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा द्यायला हवा होता. पण त्यांनी दिला नाही. सर्व पुरावे आले आहेत. अजूनही त्यांचा राजीनामा होत नाही, असेही त्या म्हणाल्या. ही तर सुरुवात करुणा शर्मा प्रकरणात झटका बसणे ही तर सुरुवात आहे. मुंडेंना कोर्टाचा हा पहिला झटका मिळाला आहे. कोर्टाचा निर्णय पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या पुढचे निर्णय सकारात्मक होतील. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा होणे गरजेचे असल्याचे तृप्ती देसाई म्हणाल्या. एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन - अंजली दमानिया या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील एका पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, 'करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.'

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article