निवडणुका संपल्यानंतर 5 लाख ‘लाडक्या बहिणी’ योजनेतून बाद:आर्थिक तिजोरीवर ताण पडत असल्याने निर्णय
3 hours ago
2
विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै २०२४ पासून शिंदे सरकारने अर्ज येईल त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी बनवले. तब्बल २ कोटी ४६ लाख महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले. मात्र आता सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारने निकषात न बसणाऱ्या अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ५ लाख महिला लाभार्थी या योजनेतून बाद झाल्या आहेत. यापैकी काहींनी कारवाईच्या भीतीने स्वत:हून योजनेतून माघार घेतल्याची माहिती महिला बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. महिला बालकल्याण विभागाकडून निकषात न बसणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. डिसेंबरमध्ये २ कोटी ४६ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाला. पण जानेवारीत २ काेटी ४१ लाख लाडक्या बहिणी पात्र होत्या. एका महिन्यात या योजनेतून पाच लाख बहिणी घटल्या. योजना २१ ते ६५ वयोगटासाठीच आहे. मात्र ६५ वर्षांवरील महिला, संजय गांधी योजना, नमो शक्ती योजनेतील महिला आणि कुटुंबातील चारचाकी वाहन असलेल्या महिलांना आता वगळले.
या ‘बहिणी’ अपात्र ठरल्या
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)