महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट- आव्हाड:म्हणाले- ज्या लाडक्या कंत्राटदारांकडून कट मिळतो त्यांना द्यायला सरकारकडे पैसे नाही, म्हटल्यावर अवघड

2 hours ago 1
राज्य सरकार कंत्राटदारांना कामाचे पैसे सुद्धा देत नाही. कंत्राटदार म्हणजे यांचे लाडके....त्यांच्याकडूनच कट टू कट योजनेचा लाभ मिळतो आता त्यांचे काम केलेले पैसे द्यायला नाहीत म्हंटल्यावर अवघडच आहे. एकेकाळी संपन्न अशा महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. दऱम्यान जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, कंत्राटदार आणि त्यांच्या संघटनेने 89000 कोटींची राज्य सरकारकडे थकबाकी असल्याची तक्रार केली आहे. लाडक्या कंत्राटदारांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. राज्यातील अनेक योजना राबवण्यासाठी सरकारकडे पैसे नाही. यांना पुढच्या भावी पिढ्यांचे भविष्य खराब करण्याचा अधिकार कोणी दिला, असा संतप्त सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे. नेमके आव्हाडांचे ट्विट काय? एकेकाळी संपन्न अशा महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे याचे पुढील काही उदाहरणे कंत्राटदार आणि त्यांच्या संघटनेने 89000 कोटींची राज्य सरकारकडे थकबाकी असल्याची तक्रार केली आहे याचा अर्थ थोडक्यात काय उपाशी रहा म्हणजे लढायला त्राण राहणार नाहीत याची पूर्ण काळजी सरकारने घेतली आहे. लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात येत आहे. तरीदेखील योजनेचा प्रचार करण्यासाठी 3 कोटी रुपयांच्या जाहिरातबाजीला मान्यता देण्यात आल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article