अंजली दमानियांचे कृषी साहित्य खरेदीवरुन धनंजय मुंडेंवर आरोप:कृषी खात्याच्या व्ही.राधांची बदली करून मुंडेंनी रान मोकळे केल्याची होती चर्चा
2 hours ago
1
गेली काही दिवस मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्याने मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यातच कृषी साहित्य खरेदी जास्त दराने केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कृषीमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यात आले होते.यावेळी वर्षभरात त्यांनी कृषी साहित्य जास्त किंमतीने घेत 275 कोटींचा घोटाळा केला असा आरोप दमानियांनी केला. हा आरोप मुंडेंनी फेटाळून लावला. मात्र त्याच काळात कृषी खात्याच्या तत्कालीन सचिवांची दिली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्ही. राधांची केली तडकाफडकी बदली गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कृषी विभागाच्या प्रधान सचिव आयएएस व्ही. राधा यांची अवघ्या दोन महिन्यांत सामान्य प्रशासन विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली. व्ही. राधा आणि तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यावेळी नमो शेतकरी सन्मान शेतकरी योजनेतील 1 हजार 400 कोटी रुपयांचा निधी खतांच्या खरेदीसाठी वळविण्याच्या धनंजय मुंडे यांच्या प्रस्तावालाही व्ही. राधा यांनी विरोध केला होता. ‘पीएम प्रणाम’ योजनेतंर्गत मिळणारे अनुदान हे 250 कोटींपेक्षा जास्त नसल्याने खरेदी योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असे मत राधा यांनी व्यक्त केले होते. तसेच या योजनेसाठी शेतकरी सन्मान योजनेचा निधीचा एक हफ्ता वळवण्यासही त्यांचा विरोध होता. कृषी फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक संस्थांनी आक्षेप घेतला होता. ‘या खरेदीत अनियमितता दिसत असून चौकशी करण्याची आवश्यकता’ असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याने कृषी मंत्री नाराज असल्याची चर्चा होती. म्हणूनच त्यांची बदली करण्यात आल्याचे त्यावेळी बोलले जात होते. कोण आहेत राधा? व्ही राधा या 1994 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. केंद्र सरकारमधील प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या 24 जून रोजी राज्यातील सनदी सेवेत परतल्या होत्या. त्यांची कृषी मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी मतभेद झाल्यानंतरच त्यांची बदली सामान्य प्रशासन विभागात करण्यात आल्याची चर्चा आहे. वडेट्टीवार यांनी देखील हाच आरोप केला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)