माफी मागतानाही शिवकार्य हीन लेखण्याचा कावा:अभिनेते किरण मानेंचा राहुल सोलापुरकरांवर पुन्हा संताप, 'साम-दाम-दंड-भेद' शब्दप्रयोगावर आक्षेप

2 hours ago 1
छत्रपती शिवाजी महाराज मोगलांना लाच देऊन आग्र्याहून सुटले असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात आला. चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियावर माफी मागितली. परंतु, अद्यापही हा वाद संपुष्टात आला नाही. सोलापुरकर यांनी माफी मागताना देखील महाराजांचा पुन्हा जाणिवपूर्वक अपमान केला, असा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला आहे. माफी मागतानाही शिवकार्य हीन लेखण्याचा कावा केला, असे किरण माने यांनी म्हटले. नेमके काय म्हणाले किरण माने? माझ्या बहुजन शिवभक्तांनो, शिवजयंतीला तुम्ही कुणाचे व्याख्यान आयोजित करत आहात त्याचा मेंदू आणि विचार पूर्ण तपासून बोलवा, असे आवाहन किरण माने यांनी केले. गेली अनेक दशके छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत, त्यांच्याविषयी खोट्या गोष्टी पेरणाऱ्या एका पुणेरी बाजारबुणग्या शिवशाहीराची पिलावळ मनुवाद्यांचा छुपा अजेंडा राबवत आहे. प्रोपोगंडा सिनेमाप्रमाणेच व्याख्यानांमधूनही हे विष पेरले जात असल्याचा आरोप किरण माने यांनी केला. शिवकार्य हीन लेखण्याचा कावा काल तो सोलापूरकर माफी मागताना जे बोलला ते नीट ऐका म्हणजे या मनुवादी बांडगुळांचे कपट कळेल. माफी मागतानाही या भिकारड्याने “छत्रपती शिवराय हे ‘साम-दाम-दंड-भेद’ या चार पद्धतीने मोठे राज्यकर्ते होऊन गेले.” हा निव्वळ खोटा आणि शिवकार्य हीन लेखण्याचा कावा खेळलाय. छत्रपती शिवराय मोठे ठरले ते गोरगरीब, कष्टकरी रयतेची घेतलेली काळजी आणि योजनाबद्ध युद्धनितीमुळे! शिवरायांनी 'ती' नीती कधीच वापरली नाही ‘साम-दाम-दंड-भेद’ हा निगेटिव्ह शब्दप्रयोग जाणीवपूर्वक खुपसला आहे. राज्यकर्ते ‘साम-दाम-दंड-भेद वापरतात’ म्हणजे काय हो? भ्रष्टाचार करा, बलात्कार करा, खून करा, पण माझ्या सत्तेत सामील होऊन माझी खुर्ची बळकट करा… तुमच्यावर कारवाई होणार नाही. खोकीच्या खोकी ओतून पक्ष फोडा पण आमची सत्ता मजबूत करा. जो झुकत नाही त्याला तुरुंगाची भीती दाखवा आणि वाकवा. घराघरात फूट पाडा. याला म्हणतात साम-दाम-दंड-भेद. शिवरायांनी राज्यकारभारात ही नीती कधीच वापरली नाही. …अहो, कट्टर विरोधात असलेल्या सावित्रीबाई उर्फ मल्लम्मा राणीवर हात टाकला म्हणून स्वतःच्या सरदाराला डोळे काढून आयुष्यभर तुरुंगात टाकणारे आणि तिचा जिंकलेला किल्ला तिला परत देणारे राजे होते ते ! साम-दाम-दंड-भेदात हे भान नसते. छत्रपती शिवरायांनी स्वतः नेमलेल्या पाटलाने प्रजेतल्या एका गरीबाच्या मुलीवर बलात्कार केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडले होते. आजकालचे साम-दाम-दंड-भेदाने सत्तेत आलेले राज्यकर्ते स्वतः नेमलेल्या मंत्र्यांवर काय कारवाई करतात हो? राजांना महान म्हणायचे, पण त्यांचे कार्य लहान करायचे राजांचा जयजयकार तर करायचा… त्यांना ‘महान’ तर म्हणायचे पण गुणगान गात-गात शाब्दिक खेळ खेळून त्यांचे कार्य मात्र लहान करायचे हे कपट वर्षानुवर्षे सुरू आहे… कधी अलगदपणे ‘लाच’ शब्द वापरायचा तर कधी ‘सामदाम’… कधी न भेटलेल्या कुणाला थेट गुरु ठरवायचे, तर कधी खऱ्या गुरु असलेल्या माता जिजाऊंचा आणि शहाजीराजेंचा मानभंग करायचा… प्रोपगंडा सिनेमांचा एक-एक सिन घेऊन मी त्यातला हा कावा सांगू शकतो. आपल्या सर्व महामानवांबाबत हे केले जात आहे. बहुजनांनो सावध रहा! जय शिवराय…जय भीम. अशी पोस्ट किरण माने यांनी पोस्ट केली आहे. हे ही वाचा... छत्रपतींचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता:आक्षेपार्ह विधानानंतर राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी, व्हिडिओ शेअर करत दिले स्पष्टीकरण अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर ते चांगलेच चर्चेत आले. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली होती. राहुल सोलापूरकर यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची या विधानामागची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. मी महाराष्ट्रातला शिवप्रेमी नागरिक आहे महाराजांचा नखभरही अवमान करण्याचा माझा प्रयत्न नाही, असेही ते म्हणाले. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article